कोरोना पेक्षा सरकार शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना छळतय
शिक्षण झालं ऑनलाईन विद्यार्थी झाले ऑनलाइन
प्रतिनिधी:- ( रवि अण्णा जाधव )
देऊळगाव राजा :- जिल्ह्यात हजारो शेतकरी भाजी पाला शेती करतात शेती ऊत्पादणावर हजारो रुपये खर्च केलेला असतो उत्पादित झालेला शेती माल दररोज मंडित नेऊन विकतो त्यावर प्रत्येक शेतकऱ्यांचं घर व शेतीच अर्थकारण चालत .मंडितुन भाजीपाला घेऊन हजारो लोक आठवडी बाजारात नेऊन भाजीपाला विकतात त्यावर अनेकाचे घर चालतात .त्यामुळे च अनेक संकटात सुध्दा जनतेला भाजीपाला मिळतो .गेल्या दोन वर्षापासून शाळा विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे शिकलेच नाही तर येणारा काळ खुप वाईट असेल .स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे. शेख जुल्फेकर .मधुकर उत्तमराव शिंगणे. पंढरीनाथ म्हस्के.गणेश मुजमुले. पंजाब मुजमुले.याला जवाबदार सरकार च असेल.
बाजारातच व शाळेत करोना येतो का हो साहेब ?
गेल्या दोन वर्षां पासून शासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत करोना ची लाट आली की आठवडी बाजार बंद होतात बाजारातील व्यापारी हे शेतकरी व गरीब असतात आठवडी बाजार बंद झाल्या मुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही आमचा शेत माल कुठे विकायचा असा प्रश्न करत आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व बाजारातील व्यापाऱ्यांनानि केली आहे ,