यवतमाळ -: गेल्या चार महिन्यापासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप पुकारला होता.आता या संप काळात आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रात सध्या दुखवटा सुरु आहे.
यामुळे गेल्या चार महिन्यापासून एसटी कामगारांचे वेतनही नसल्याने सध्या एसटी कर्मचारी आर्थिक संकटात आले असल्याने याची दखल घेऊन भाई अमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भाई अमन यांनी दुखवटा मंडपाला भेट दिली व दुखवट्यात सहभागी कर्मचाऱ्यासोबत चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
त्याठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त करत अनेक कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूची भाई अमन वेलफेअर असोसिएशनच्या
माजी आमदार विजयाताई धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई अमन,मिनाक्षी सावळकर यांच्या हस्ते दि.१९ जानेवारी रोजी जिवनावश्यक साहित्य वाटप दिले.
यावेळी उपस्थित असलेल्या एकूण 40 कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले व उर्वरित 200 कीट देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाई अमन,गणेश नाईक,शेख नाझिम,फिरोज पठाण,अजय ठाकुर,मोनु डाॅन,भाई अमन वेलफेअर असोसिएशनचे सदस्य आदी उपस्थित होते.
Post Views: 232