Home बुलडाणा जळगांव जामोद तालुक्यातील इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचा काम उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

जळगांव जामोद तालुक्यातील इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचा काम उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

159

🔹महसूल विभागाची परवानगी नसतांना खोदला रस्ता

🔹संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले

अमीन शाह

बुलडाणा – 7 मे

जळगांव जामोद तालुक्यातील इस्लामपुर गावा जवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तैयार होत असलेल्या इस्लामपुर उपसा सिंचन योजनेच्या आता पर्यंतच्या झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भरष्टाचार झाल्याची ओरड नेहमी होत असते परंतु काही राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी आपले घशे भरून घेतल्यानेच संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची घटना आज पुन्हा समोर आली आहे.ठेकेदाराने महसूल विभागाची कोणतीही परवानगी ना घेताच इस्लामपुर-हाशमपुर व शेत रास्ता खोदुन टाकला ही माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर काम बंद पाडला आहे.
तापी पाठबंधारे विभाग अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यात इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचे काम सुरु आहे.जळगाव खानदेश जिल्ह्यातील तापी नदीवरच्या हतनुर धारणाचा तसेच जिगांव धरणाचे पाणी पाइप द्वारे इस्लामपुर योजनेत आणले जाईल व हा पाणी शेतीसाठी वापरले जाणार आहे.या योजनेत शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली जाणार असून अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन शासनाला विकली आहे.योजेनेच्या कामा संदर्भात अनेक वेळी भरष्टाचार झाल्याचे आरोप होत असतात.अनेक राजकीय नेते व तापी पाठबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी “वाहती गंगेत आपले हाथ धोऊन टाकले” अशी चर्चा नेहमी समोर येत असते.राजकिय नेते व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने योजनेचा ठेकेदार सामान्य शेतकऱ्यांवर दबाव टाकून आपली मरजीने काम करीत आहे.आज 7 मे रोजी ठेकेदाराने इस्लामपुर ते हाशमपुर व इतर शेतात जाणारा रस्ता महसूल विभागाची कोणतीही परवानगी ना घेताच खोदुन टाकल्याने स्थानिक शेतकरी आक्रमक झाले होते व त्यांनी सदर काम बंद पाडला.रस्ते खोदुन टाकण्याची परवानगी ठेकेदाराला देण्यात आली का? अशी माहिती जेंव्हा तहसीलदार यांच्याशी काहीनी घेतली असता तहसीलदार यांनी अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, अशे सांगितले.शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांचा धाक दाखवून तापी पाठबंधारे विभागाचे राणे, किशोर चौधरी तसेच ठेकेदारा आपली मनमानी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा काम करीत असून आम्हाला सदर खोदलेले रस्ते सुरु जैसेथे करून द्यावे अशी मागणी स्थानिक शेतकरी अबरार खान,तस्लीम खान,ज़ियाउल्लाह खान,राज़ीक खान,शराफत खान,नज़ाकत खान,सखाउल्लाह खान,शफीक खान,ज़मीर पटेल व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.