Home कृषि व बाजार कर्जमुक्ती योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला

कर्जमुक्ती योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला

203

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

गत काही वर्षांत एकामागून एक नैसर्गिक संकटे येत असताना कर्जफेड होऊ शकली नाही. मात्र, शासनाने आमची व्यथा जाऊन घेऊन कर्जमुक्ती योजना आणली. त्यामुळे आमच्या डोक्यावरील कजार्चा डोंगर उतरल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे, अशी भावना आज महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केली.कोरपना तालुक्यातील याबाबत शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने राऊ अशी भूमिका घेत शिवसेनेने शेतकऱ्याचा पहिला निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहेत सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय या सरकारने असे कोरपना तालुक्यातील जाणकार व्यक्तींकडून बोलल्या जात आहेत.