प्रतिनिधी:-(रवि जाधव)
देऊळगाव राजा – शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम आणि उर्वरीत वेळेत मिळेल ते पार्ट टाइम काम करून आलेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकण्याची वेळ राज्यातील बिनाअनुदानी शाळांतील हजारो शिक्षकांवर व महिलांवर आली आहे.आज ना उद्या अनुदान मिळेल या आशेवर त्यांनी आता चाळीशीही ओलांडली आहे.शिक्षकांना भविष्याची चिंता आता सतावत असून एक एक दिवस त्या आशेवर काढत आहे.आता दुसरी नोकरी लागण्याची वेळ निघून गेल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा याची चिंता या महिला व शिक्षकांना सतावत आहे. एवढे मात्र खरे….!