जिल्ह्यातील गर्दीने करोना ग्रस्थाचा आकडा वाढला….
आज 65 नवे करोना रुग्ण….
अमीन शाह
शासकीय आदेशानुसार जिल्ह्यात सर्व दुकाने वयवसाय हे सकाळी 9 ते 3 वाजे पर्यंत सुरू आहे प्रत्यक्षात मात्र काही दुकाने दिवसभर सुरू असल्याचे दिसत आहे प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष होत असून रोज गर्दीचा व लोकांचा उद्रेक होत आहे भाजी बाजार , किराणा दुकान वर तर कोणतेही नियम पाळले जात नसून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडत असल्याचे दिसत आहे , आपल्या जिल्ह्यात रोज करोना रुगनांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढत आहे आज नव्याने 65 रुग्ण वाढले असून याला प्रशासन जवाबदार नाही का ????
आपल्या जवळच्या जालना जिल्ह्यात 10 दिवसाचा कडक लोकडाऊन केला जात असून तेथील रस्ते मार्केट निर्मनुष्य झाले आहेत , याचा परिणाम तिथे लवकरच दिसून येणार असून आहे . आपल्या जिल्ह्यात 1 जुलै रोजी मा . जिल्हाधिकारी महोदय यांनी एक महिन्याच् लोकडाऊन जाहीर करून तसा अध्यादेश ही काढला होता त्यांच्या आदेशात काय सुरू काय बंद हे होते ? त्या नंतर 6 जुले रोजी जिल्ह्याचे मा , पालकमंत्री यांनी तातडीची बैठक घेऊन जिल्हयात 21 दिवसाचा अर्ध्या दिवसाचा लोकडाऊन जाहीर केला खर्च राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नंतर याची गरज होती का ??
गर्दी रोकणार तरी कोण ???
जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहर बुलडाणा , चिखली।, मेहकर खामगाव , लोणार , नांदुरा , देऊलगावराजा , साखरखेरडा , डोनगाव आदी सर्वच शहरात सकाळ पासूनच खरेदी साठी लोकांची तोबा एकच गर्दी होत आहे होणाऱ्या गर्दी मूळे करोना चे संक्रमण वाढत आहे आता तर करोना ने ग्रामीण भागात आपले पाय पसरविण्याची सुरवात केली असून ,ग्रामीण भागातील लोक खरेदी करण्यासाठी शहर ला जात आहे या मुळे शहरी भागातून करोना वायरस ग्रामीण भागात पहोचत आहे आज मिळालेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात जे करोना पॉझेटिव्ह रुग्ण सापडले आहे त्यात अधिकांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत , ही फार चिंतेची बाब असून विचार करण्याची गरज आहे .
संपूर्ण लोकडाऊन ची आवश्यकता ,
आज आपल्या बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण कडक लोकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली असून लोकांची गर्दी रोखणे जरुरीचे झाले आहे आज मेहकर , चिखली , डोंनगाव , साखरखेरडा , येथे रोज बाजार भरत असून या बाजारात सर्वच वस्तू तंबाखूजन्य पदार्थ मिळत असल्याने लोकांची भरपूर गर्दी होत आहे संबंधित यंत्रणा गर्दी रोकण्यात असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .
करोना चा उद्रेक थांबणार केव्हा ???
करोना चा उद्रेक थांबणार तरी केव्हा या करोना च्या वाढत्या उद्रेका मूळे गरीब मजूर व ग्रामीण भागात जाऊन वायसाय करणाऱ्यांचे फार हाल होत आहे गरिबांना काम मिळत नाही तर गरीब वायसायिकांना खेड्यावर लोक हाकलून देत आहे त्या मूळे गरीब वायवसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे , या वर एकच उपाय आहे आपल्या जिल्ह्यात दहा पंधरा दिवस कडक लोकडाऊन करण्याची आवश्यकता आहे.