Home पश्चिम महाराष्ट्र प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम पोस्टाद्वारे लाभार्थ्याच्या घरी पोहोच करा – जिल्हाधिकारी...

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम पोस्टाद्वारे लाभार्थ्याच्या घरी पोहोच करा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

190

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

सांगली – करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व एखादा संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकेंमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एकत्र येवून गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रियक्रत बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची गाव निहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे त्वरीत सादर करावी, जिल्हा अग्रणी बँकेने सदरची यादी एकत्रित करुन पोस्ट ऑफिसकडे जमा कराव्यात, पोस्ट ऑफिसने लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जावून सदरची रक्कम अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व संबधित यंत्रणेला निर्गमित केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ अन्वये तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच राष्ट्रियक्रत बॕकेतील लाभार्थ्यांची होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने, याच पद्धतीचे अनुकरण करून इतर जिल्हा प्रशासनाने सुद्धा असे आदेश निर्गमित करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा असे सर्व सामान्य पंतप्रधान गरिब कल्याण योजनेतील प्राप्त लाभार्थ्यांमधुन बोलले जात आहे.