Home बुलडाणा राज ठाकरेंना सध्या प्रसिद्धी ची गरज,ना , जयंतराव पाटील

राज ठाकरेंना सध्या प्रसिद्धी ची गरज,ना , जयंतराव पाटील

170

http://https://youtu.be/LcJXQzZkkSo

अमीन शाह

बुलडाणा:- केंद्र सरकारने पास केलेल्या कृषी कायद्याला राज ठाकरे समर्थन करीत असल्याच्या प्रश्नावर राज ठाकरेंना सद्या प्रसिद्धीची गरज असल्यामुळे ते बिचारे समर्थन करताय त्यांना तुम्ही किती महत्व द्यायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी आज सोमवारी 8 फेब्रुवारीला बुलडाण्यातून केली.ते आज राष्ट्रवादी कार्यकर्ता परिवार मेळाव्यानिमित्त बुलडाण्यात आले असता अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयपरिसरात पत्रकारांशी बोलत होते.त्यांच्या सोबत अन्न व औषध तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे होते

 

-हे वक्तव्य केले होते राज ठाकरेंनी-

सरकारने जो कृषी कायदा आणलेला आहे.ते चुकीचे नाहीत.मात्र त्यामध्ये त्रुट्या असु शकते निश्चित.परंतू केंद्रांनी राज्याचा विचार करून त्याच प्रकारे प्रत्येक राज्याचा विचार करून राज्यांशी चर्चा करून या कायद्याची अंमलबजावणी करायला पाहिजे.असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेले आहे.