
जितेंद्र हिंगास पुरे – लोक संग्राम
यवतमाळ – मंडल आयोगाच्या विरोधाची तीव्रता वाढविण्याकरिता तत्कालीन भाजपा नेतृत्वाने विद्यार्थी परिषदेने व प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिथावणी दिलेल्या आंदोलनात भावनेच्या आहारी जावून अनेक तरुणांनी सार्वजनिकरित्या आत्मदहन केले होते . कै.गोपीनाथजी मुंडे यांच्या व्यतिरिक्त राज्ययातील यच्छयावत भाजपा नेते मंडल आयोगाच्या शिफारसी विरुध्द होते . अगदी कै . प्रमोद महाजन सुध्दा जाती धर्मावर आधारलेल्याक कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध नव्हेतर हे आरक्षणच रद्द करा अशीच भुमिका भाजपाची मातृसंस्था , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे . भाजपाच्या नेत्यांनी आरक्षणावर तोंड उघडण्यापूर्वी सरसंघचालक श्री . मोहन भागवत यांच्याकडून जात व धर्माच्या आधारावरील आरक्षणच धोरण संघाने बदलले आहे . एवढे जाहिर करुन घ्यावे , मगच आरक्षणावर आपली मते व्यक्त करावीत . अन्यथा , ‘ वरुन किर्तन आतून तमाशा ‘ अशी हास्यास्पद अवस्था पाजपाची झाली आहे . मराठ्याना आरक्षण हवे मग काँग्रेस / राष्ट्रवादीच्या सरकारने मराठयांना १६ % व मुसलमानांना ५ % आरक्षण जाहिर केल्यानंतर भाजपाने पाठिंबा का दिला नाही ? नारायण राणे समितीच्या शिफारसींना तत्कालीन केलेला विरोध व त्यावेळच्या भाजप नेत्यांच्या वल्गना ग्रामिण भागातील जनता विसरलेली नाही . भाजपामध्ये अमुलाग्र बदल झाला असून आजचा भाजप हा केवळ उच्चवर्णिय व उच्च वर्गाचा झाला आहे . महाराष्ट्राच्या राजकारणाचा वजा शुन्य , अनुभव , शुन्य नेते जेणू काही आपणच भाजपाचे कर्ते – धर्ते आहोत अशा थाटात वल्गना करित असतात . संघ स्वयंसेवक , जनसंघाचे संघटन मंत्री , कै . उत्तमराव नानासाहेब पाटील बरोबर सलग ३० वर्षे काढलेल्या माझ्या सारख्या व्यक्तीशी गद्दारी करणारे भाजपा नेत्यांनी केवळ मी धनगर आहे म्हणूनच माझ्याशी गद्दारी केली . भाजपाचे नेते खामगांवचे माजी आमदार कोकरे साहेब , अण्णासाहेब डांगे , भाजपमध्ये असलेल्या धनगर समाजाच्या एकाही नेत्याशी भाजपाने गद्दारी करण्याचे सोडले नाही . कै . गोपिनाथ मुंडे व शरद पवारांचे राजकीय शत्रूत्व होते . म्हणून माझेही मतभेद होते . टोकाचा विरोध करु नये . शरद पवार किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रेमाचे व सन्मानाचीच वागणूक दिली , जी मला
फडणवीस यांच्या कालखंडात मिळालेली नव्हती . मुंडे साहेबांचे व माझे अनेकदा कडाक्याचे भांडण झालीत . पण त्यांनी कधी कटूता ठेवली नाही . ३-३ , ४-४ महिने आम्ही बोलत नसू , पण अचानक कधीतरी साहेबांचा फोन यायचा पुनच्छ पुर्ववत काहीच न घडल्यासारखे संबंध पूर्ववत होत असत . इतरांना आश्चर्य वाटे पण मनाचा मोठेपणा व दिलदार वृत्ती जन्मजात रक्तातच असावी लागते . ती नाटक करुन येत नाही . भाजपामध्ये नव प्रवेशितांना कळेल तेव्हा त्यांना सर्वप्रथम माझीच आठवण येईल . मा . शरद पवारांवर आपली टिका करण्याची पात्रता आहे की नाही , आपला अनुभव किती , राजकारणातील आपले योगदान काय ? याचा विचार न करता काही लोकं टिका करतात . पण याला ‘ शिढी लावुन उंटाच्या गांडीचा मुका घेणे ‘ असे म्हणतात . अर्थात , हे उंटावरच अवलंबून आहे की , मुका घेवू घ्यायचा की नाही . गावातील एखाद्या ‘ बाई माणसाला ‘ अपत्य झाले तर आमच्याकडे म्हणतात , करुन दिले गांव व कांदेकरांचे नाव अशी काहीशी अवस्था गोपिचंद पडळकरांची झाली आहे .
आणि जातीच्या नावावर भडकवा – भडकवी करणे याची सुधारीत आवृत्ती म्हणजे आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाने घेतलेली भूमिका आहे . प्रखर हिंदूत्वाच्या गप्पा मारुन काश्मिरमध्ये मेहबूबा मुक्तीच्या गळ्यात मिठ्या मारायच्या या मागील भाजपाची सत्ता लोलुपता निश्चितच दिसून येते . राज्यात १०५ आमदार निवडूण येऊनही सरकार स्थापनेच्या जवळसुध्दा जाता आले नाही . ज्याचे ५६ निवडून आले . त्याचा मुख्यमंत्री , ज्याचे ५४ निवडून आले त्याचे उपमुख्यमंत्री , ज्याचे ४४ निवडणूक आले त्याचे मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष , बरे १०५ चे १०६ झाले , तरी बदल नाही याचे एकमेव कारण अहंकार , आपल्याच लोकांचे काटे काढणे , वर्षा नाईट क्लबमध्ये कारस्थानी करणे , मुह में राम , में छुरी असे दुपट्टी धोरण आणि वारेमाप आश्वासनाची वाचाळता व ज्याच्या मागे ५-१० आमदार नाहीत अशा खुषमस्कऱ्याच्या कळपात स्वप्न रंजन यातूनच सत्ता स्थापनेच्या जवळ सुध्दा जाता आले नाही . अर्थात , सलग अर्धशकत ज्यांच्या बरोबर व्यथीत केलं , सत्तेसाठी तंची अशी तडफड पाहिल्यानंतर माझ्या सारख्या कठोर मनाच्या माणसालासुध्दा दुःख होते . मी या आधीही सांगत होता , आताही सांगतो व भविष्यातपण सांगेन की , शरद पवार हे रसायन तुमच्या अकलेच्या पलिकडचे आहे . हे सरकार फक्त शरद पवारच पाडू शकतात . तुमच्या अवकातील हि गोष्ट नाही . याला आमच्याकडे खानदेशात ‘ दाखडनं काही व घालण काही ‘ असं म्हणतात . भाजपा घेत असलेल्या दुटप्पी भूमिकेमागील सत्ताकारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लहान लहान कार्यकर्त समजून चुकले आहे . मुगेरीलाल के हसीन सपने पहायचे बंद करा ! शरद पवार हे सपनो के सौदागर आहेत व तुमच्या स्वप्नांचा सौदा आधीच करुन ठेवला आहे . असे पत्रक आज राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष यांनी प्रसिध्दीस दिले आहे .









































