Home उत्तर महाराष्ट्र पत्रकारा संरक्षण समिती पुणे जिल्हा च्या वतिने दिले राज्यातील ग्रामीण व शहरी...

पत्रकारा संरक्षण समिती पुणे जिल्हा च्या वतिने दिले राज्यातील ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्यांचे शासन दरबारी निवेदन

268
0

नांदेड , दि. ४ ; ( राजेश भांगे ) –
पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा च्या वतिने राज्यातील , शहरी व ग्रामीण पत्रकारांची शासन दरबारी नोंद घेणे व संपुर्ण महाराष्ट्रात टोल माफी आणि आधिस्विक्रतीची अट घालत घरकुल व आरोग्य योजना राबविणे तसेच शस्त्र परवानास तात्काळ मंजुरी देण्यात यावे व आदि मागण्याचे निवेदन दि.२-३-२०२० . रोजी मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माननिय मुख्यमंत्री महोदय , महाराष्ट्र राज्य मंत्रालय , मुंबई यांना देण्यात आले.
जगात सर्वत्र पत्रकारास लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ मानले जाते व पत्रकार हे प्रत्येक देशातील , राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांच्या समस्या सत्याने सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु ग्रामीन भागातील पत्रकारांना साधे मानधन सुद्धा मिळत नाही , आधिस्विक्रती नाहि , पेंशन नाही व आज घडीला शासना कडे पत्रकारांसाठी योग्य व पुरेशा योजना नाहीत.

त्यामुळे पत्रकारांची आर्थिक व मानसिक परिस्थिती पाहता शासना कडुन बाळशास्त्री जांभेकर घरकुल योजना राबविण्यात यावी तसेच पर्यटन शासनाच्या परिवहन बस व रेल्वे मध्ये प्रवास करताना मोफत सेवा देण्यात यावे. तसेच अनेक प्रसंगी पत्रकारांना समाजातील होणाऱ्या अन्याया विरोधात व जन् सामान्यांच्या प्रश्नांना व तसेच संवेदनाशील प्रकरणांना आपल्या पत्रकारी तेच्या माध्यमातुन वाचा फोडत असताना व ज्या समाज कंठकांच्या विरोधात ( समाज हितासाठी ) लोकशाहि च्या चौथा आधारस्तंभाचा , पत्रकारितेचा एक निर्भिड पत्रकार म्हणून वापर करीत असताना त्या पत्रकारांच्या जीवावर बेतु शकते , जीवीतास धोका निर्माण होवु शकते. याचाच विचार करून शासनाने पत्रकारांची शासन दरबारी नोंद करावी व पत्रकारांच्या ” स्व”रक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाना मंजुरी त्वरीत देण्यात यावी. आदि मागणीं चे निवेदन पत्रकार संरक्षण समिती चे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भाऊ उंद्रे , जगदिश उंद्रे , योगेश उंद्रे , शिलवंत कांबळे व अशोक आव्हाळे तसेच पत्रकार संरक्षण समिती चे समस्त पत्रकार सदस्य पुणे जिल्हा यांच्या वतिने जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माननिय मुख्यमंत्री महोदय यांना देण्यात आले.

Previous articleरक्तदान,वृक्षारोपण,प्रबोधनपर व्याख्यान आदी उपक्रम करुन घुंगराळा येथे शिवजयंती साजरी.
Next articleविद्यार्थीनि अभ्यास मनःपूर्वक करावा -निराबाई पाटील
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here