Home विदर्भ कत्तलीसाठी नेत असलेल्या 45 गोवंशांस जिवनदान , “अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई”

कत्तलीसाठी नेत असलेल्या 45 गोवंशांस जिवनदान , “अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई”

112

देवानंद खिरकर

अकोट ग्रामीण पोलिसांनी महशिवरात्री ऑपरेशन यशस्वीपणे राबवित कत्तली करीता जंगल मार्गाने आणल्या जात असलेले 45 गोवंश जप्तीची धाडसी कारवाई 21 फेब्रुवारी रोजी केली.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाने वाहन असलेल्या नंदीबैलांना जिवदान मीळाल्याने गोवंश प्रेमीत समाधान होत आहे.मध्यप्रदेशातून पायदळ अकोटकडे गोवंश कत्तली करीता आणल्या जात असल्याची माहीती ग्रामीन पोलिस स्टेशन ठानेदार फड यांना मीळाली.माहितीची पडताळणी करीता अकोट नजीक खुदानपुर परिसरातील जंगलात सापळा रचला .यावेळी काही इसम हे गोवंशाचे जथ्था घेऊन येत असल्याचे दुष्ट्रीस पडले.तात्काळ पोलिस स्टेशन मधिल पोलिस ताफा बोलावून 45 गोवंश पकडले.यावेळी घटनास्थळावर एकदमच पोलिस दाखला झाल्याचे पाहून आरोपी जंगलात पळून गेले.त्यामूळे स्थानिक युवकांच्या सहकार्याने सर्व गोवंश रस्त्याने सुरक्षित आणत गोरक्षन समितीच्या ताब्यात देण्यात आले.ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या 45 गोवंशाची किंम्मत बाजारपेठेत 3 लाख 81 हजार रुपये असुन या प्र्कर्नी 4,5 अन्यात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस आरोपिचा शोध घेत असुन पुढिल तपास सुरु आहे.ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठानेदार फड,उपनिरिक्षक धर्माजी डाखोरे,नारायण वाडेकर,अनिल सीरसाट,प्रवीण गवळी,नदकीशोर कुलट,वामन मिसाळ,रामेश्वर भगत,मोतीराम गोंडचवर,विजय साबळे,आर सी पी पथक यांनी केली.ग्रामीण पोलिसांचे महाशिवरात्री ऑपरेशन अकोट लागत असलेल्या सातपूडा जंगल पलिकडे मध्यप्रदेशाची सीमा आहे.कत्तली करीता गोवंशाची तस्करांना या जंगलतील मार्ग सोयीचे ठरत असल्याचे अनेकदा उघडकिस आले आहे.जंगलातील अतिसंरक्षित भागातून वाहनाद्वारे जनावरे आणल्या जातात.त्या नंतर वाहनातून खाली उतरून या जनावरांचा जथ्था पायदळ अतिदुर्गम मार्गाने पोपटखेड धरणावरुन आंबोडा अकोलखेड मार्गे खुदानपुर परिसरात दाखल होताच ही कारवाई केल्याची माहिती पूढे येत आहे.वनविभागाचा बहुतांश भाग हा व्याघ्र प्रकल्पाचे हद्दीत येतो.या भागातून गोवंश येत असतिल तर कारवाईचा पेच निर्माण होता.शिवाय गोवंश तस्करी करणार्याचे सहकारी पायदळ गोवंश आणत असतांना दुचाकीने पुढे येऊन रस्त्याची टेहाळणी करता रस्त्यावर पोलिस किवा कोणीच नसल्याने पाहुन नीयोजीत मार्गाने हे गोवंश कत्तली करीता सुरक्षितस्थळी पोहचवले जातात त्यामुले ही परिस्थिती टाळण्यासाठी अकोट ग्रामीणचे ठानेदार फड आपल्या पोलिस कर्मच्यार्यासह पहाटेपासूनच गोवंश येत असलेल्या मार्गावर दबा धरुन बसलेले होते.जनावराचा जथ्था दिसताच त्यांनी अचानक तूटून पडत कारवाई केल्याचे समजते.