गुलशेर शेख ,
दुसरबीड : समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना थांबण्याचा नावच घेत नाही. हा महामार्ग सुरु झाल्यापासून चार महिन्यात २५३ अपघात होऊन २८ जणांनि आपला जिव गमावल्याची माहिती माहिती प्राप्त झाली असून आज दि. २९ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमरास सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड जवळ मेहकर कडून औरंगाबाद कडे जाणारी चारचाकी एम-एच ०२ सीआर १४५९ क्रमांकाचे वाहन दुभाजकावर धडकले. त्या पाठोपाठ कारने पेट घेण्यास सुरुवात केली. त्या मध्ये बसलेल्या तिन जणांपैकी दोन जणांचा होरपडून मृत्यु झाला. तर अजय दिनेश भिलाला वय (२२) रा. मोहन बडोदिया जि . शाजापूर मध्य प्रदेश हा व्यक्ती अपघातादरम्यान वाहनाच्या बाहेर फेकल्या गेल्यामुळे थोडक्यात बचावला. परंतु तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्यास मेहकर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते उपचारा दरम्यान त्याचा ही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे चारचाकी वाहनामध्ये ७ ते ८ डिझलची कॅन असल्यामुळे गाडीने पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अपघात होताच एपीआय अरुण बकाल, पोलीस उपनिरिक्षक राजेश गायकी, पोकॉ. गोविंद उबरहंडे, पोना. विठ्ठल काळूसे, मिलिंद ताकतोडे, विनोद राठोड यांनी अपघातस्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. व मृतकांना रुग्णालायात पाठविण्यात आले असून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करुन मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.
डिझेल चोर असल्याचा संशय ,
दोन्ही वाहनात ऐकून 19 डिझेल च्या कैना भरून होत्या गाडी भरधाव वेगात होती गाडीचा अपघात होताच गाडीत असलेल्या डिझेल ने पेट घेतला काही कळण्याच्या आधीच गाडीतले दोघे जळाले तिसऱ्या ने उडी घेतली होती मात्र तो ही गँभीर जखमी असल्या मुळे त्याचा ही मूर्त्यु झालं दुसऱ्या गाडीतले चोर पळून गेले ते पकडले गेल्यावर या अपघाताची सम्पूर्ण माहिती मिळणार आहे पोलीस विभाग या अपघाताचा तपास करीत आहे ,
https://youtu.be/zqrbTC–uXg
दुर्घटना स्थळाचे विडिओ ,