Home विदर्भ शेतकऱ्यांनी विदर्भातील २१ पावन मृदांसह हरीयाना, पंजाब व इतर प्रांतातील १०१ गावांची...

शेतकऱ्यांनी विदर्भातील २१ पावन मृदांसह हरीयाना, पंजाब व इतर प्रांतातील १०१ गावांची माती पंतप्रधानांना दिली

170

कीसान काॅंग्रेससह शेतकरी आरक्षणाचे समर्थक सहभागी

ईकबाल शेख

वर्धा “मिट्टी की सौगंध देश नही बिकने दूंगा” या निवडनूक काळातील गर्जनेची आठवन प्रधानमंत्री मोदी यांना करून देत देशासाठी ज्या मातीची तुम्ही शपथ घेतली तीही उद्योजकांच्या तिजोरीत जान्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया यावेळी शेतकरी आरक्षणाचे नरेश भागडकर आणि धनराज टूले यांनी व्यक्त केली. नेरीचे सरपंच धनराज टूले व सावळापूरचे माजी सरपंच नरेश भागडकर यांच्यासह शेतकरी आरक्षणाचे शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कीसान काॅंग्रेससह प्रधानमंत्री निवास गाठले.

विदर्भातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र महात्मा गांधींची कर्मभूमी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, विनोबाजींचे पवनार, स्वात्यंत्रता संग्रामातिल शहीदांची ऐतिहासिक पृष्ठभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आष्टी, वरूड तालुक्यातील बेनोडा, धामणगाव तालुक्यातील भिकाजी महाराजांचे आष्टा, राष्ट्रसंतांची पंढरी मोझरी, रुख्मिनीचे माहेर कौडन्यपूर, समुद्रपूर तालुक्यांतील सामाजिक ऐक्याची पवित्रभूमी गिरड व आर्वीचे तेलंगराय देवस्थान, हिंगणघाट तालुक्यांतील नानाजी महाराजांची कापसी, भोजाजी महाराजांचे आजनसरा, नगाजी महाराजांची पारडी, केजाजी महाराजांचे घोराड, महात्मा गांधींनी हरिजनांसाठी सर्वप्रथम उघडले ते लक्ष्मीनारायण मंदीर, गोंड राजांची भूमी चंद्रपुर, दिक्षाभूमी नागपूर, गाडगेबाबांची पूण्यभूमी रूनमोचन, प्रभू रामचंद्रांची भूमी रामटेक, वर्धा नदिच्या काठाची, संत लहानुजी महाराजांचे टाकरखेडा व संत सत्यदेव बाबांचे भिष्णुर या पुण्य स्थळांची माती यावेळी नरेन्द्र मोदींना देन्यात आली.

फक्त काही निवडक उद्योग समूहांच्या आर्थकारनाचा विचार करन्या ऐवजी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून काळे कायदे रद्द करन्यासाठी विनंती करणारे शैलेश अग्रवाल यांचे पत्र यावेळी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री निवासावरील अधिकाऱ्यांना दिले.