Home विदर्भ वाहन चालवितांना कुंटूंबाच्या जबादारीचे भान ठेवा  – खासदार रामदास तडस

वाहन चालवितांना कुंटूंबाच्या जबादारीचे भान ठेवा  – खासदार रामदास तडस

165

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १४ :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळणवळणासाठी सोईचे ठरत असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. तरुणांनी वाहन चालवितांना वाहतुक जियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वत:सोबत कुंटूबिय आणि इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी , असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

आज सामाजिक न्याय भवन येथे उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस वाहतुक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतुक सुरक्षा अभियानाचे उदघाटन करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, पोलिस वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती.

पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यु होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु आजच्या काळात अपघाताने मृत्यु होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यु होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नविन कायदयासोबतच दंड व शिक्षेत सुध्दा वाढ केली आहे. या कायदयातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दुस-याच्या जीवाचा सुध्दा विचार करावा असे श्री तडस म्हणाले.

परिवार हा आयुष्याचा केद्र बिंदू आहे आपली एक चुक दुस-यांच्या मृत्युस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गा|च्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्हयात सुरु आहे. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडतांना तसेच वाहन चालवितांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. केंद्र शासनाने केलेल्या नविन वाहतुकिच्या नियमाची स्वत: माहिती घेऊन जनजागृती करावी या कायदयातील तरतुदीनुसार अपघातास कारणीभूत ठरल्यास कोणती ‍ शिक्षा होऊ शकते. याची माहिती नागरिकांना पटवून दयावी असे श्री भिमनवार म्हणाले.

दरवर्षी अपघाताचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करण्याच्या भारत सरकारचे लक्ष आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्हयात यावर्षी 6 टक्के अपघात कमी झाले आहे. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मदयप्राशन करुन वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतुक करणे व वाहन वेगाने चालविणे या बाबी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष नागरिक व कुंटूंबाचे आपल्याप्रती काही देणे आहे हे समजून वाहतुकीच्या नियमाचे पालन करुन वाहने चालवावीत असे आवाहन पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांनी केले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्याथी, विद्यार्थींनी , नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय तिराणकर यांनी तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.