पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,
अमीन शाह
मेहकर
तालुक्यातील दे , माळी येथुन जवळच असलेल्या कोराडी प्रकल्प धरणावर गावातील काही युवक सकाळी सहा वाजता पोहण्यासाठी गेले असता, सांडव्याच्या पाण्यात अडकले, या मध्ये गोपाळ दत्ता जाधव वय 18, विजयानंद किसन कुडके वय 22, शुभम दिनकर गवई वय 22, सलमान जाकीर पठाण वय 22, , संतोष सुखदेव माने वय 18 हे तरूण पोहण्यासाठी गेले अचानक धरणातील पाण्याचा प्रचंड प्रमाणात प्रवाह वाढल्यामुले वरील तरुण पाण्यामध्ये वाहून गेले यासंदर्भात गावात माहिती मिळताच गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्यातील सलमान पठान शुभम गवई यांना सुखरूप बाहेर काढल्या नंतर अकरा वाजता जिल्हा आपत्ति बचाव पथक मेहकर येथील पोलिस प्रशासनाचे कर्मचारी व गावातील विजय सुरुशे आलम पठाण अखिल पठाण ,ऋषिकेश चालगे इत्यादी तरुण संतोष माने या तरुणाला वाचण्यासाठी पाण्यामध्ये उत्तरले परंतु त्यामध्ये दुर्दैवाने विजय सुरूशे कुस्ती पैलवान या तरूणाचा पाण्यामध्ये अडकल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते त्या ठिकाणी बेशुद्ध पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोन वाजता जिल्हा आपत्ती शोध बचाव पथक, पोलीस प्रशासन, गावातील आलम पठाण अखिल पठाण व गावातील असंख्य तरुणांच्या मदतीने संतोष माने तरूणाला बाहेर काढण्यात यश आले, या मोहिमेमध्ये कार्यामध्ये जिल्हा शोध व बचाव पथक व संभाजी पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , कृष्णा जाधव ,राजेंद्र झाडगे, प्रवीण साखरे ,वाहनचालक पी.एस खरे जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा पोलीस पथकातील तारासिंग पवार हेड -कॉन्स्टेबल ,दिपक वायाळ ,व त्यांचे सहकारी यांच्यासह मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान साहेब उपविभागीय अधिकारी गणेश राठोड साहेब पोलीस प्रशासनाचे असंख्य कर्मचारी आरोग्य विभाग गावातील तरुण यासह त्याने मदत करून या तीनही तर चारही तरुणांना सुरक्षित बाहेर काढले परंतु दुर्दैवानं विजय सुरवसे यांचा मृत्यू झाल्यामुळे देऊळगाव माळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ावकर्यांनी गड आला पण सिंह गेला अशी भावना व्यक्त करून जिल्हा आपत्ती उशीरा पोहोचल्यामुळे त्यांच्यावर रोष व्यक्त केला सकाळी सहा वाजता फोन करून हितून अकरा वाजता पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विजय सुरवसे वय वर्ष 40चाळीसच्या जाण्याने देऊळगाव माळी गावात सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई भाऊ व वडील असा खूप मोठा आप्तपरिवार आहे