देवानंद जाधव – मंगरूळ
यवतमाळ – यवतमाळ लगत किन्ही येथे अज्ञात वाहनाने पाच गाई चिरडल्या ची घटना राञीचे दरम्यान घडली.आर्णी तालुक्यातील गणगाव (साकुर)येथील गोपालक आप आपल्या गाई पावसाळा लागताच यवतमाळ तालुक्यातील खरद येथे गुराख्या कडे राखायला ठेवतात, सोमवारी राञीचे दरम्यान सदर गाई गोठ्यातुन पसार झाल्या. परिणामी त्या वाहनाच्या धडकेत चिरडल्या गेल्या. चार गाई साकुर येथील ऊकंडा कोटनाके, आणि एक गाय गणगाव येथील वामण सदाशिव घरडे यांच्या मालकीच्या होत्या. गोर गरीब गोपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी या पिडीत गोपालकांनी केली आहे.