Home मुंबई राठोडी गावचे रेशन दुकान निलंबित झाल्याने नागरिकांची दुकान नजीक देण्याची मागणी –...

राठोडी गावचे रेशन दुकान निलंबित झाल्याने नागरिकांची दुकान नजीक देण्याची मागणी – सुरेश वाघमारे

161

मुंबई , ( प्रतिनिधी ) – सरकारने देऊ केलेले मोफत तांदूळ दुकान क्रमांक ४२ ग १९४ या रेशन दुकानदारने तक्रार दार सुरेश वाघमारे याना नाकरल्यामुळे दोषी आढळून आल्याने दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी दुकानाचे प्राधिकार पत्र परवाना निलंबित करण्यात आल्यामुळे सदर दुकान आजमी नगर या ठिकाणी वर्ग करण्यात आल्याने राठोडी गाव येथील कार्ड धारकांची आजमीनगर येथील दुकानं क्रमांक ४२ ग २९७ या दुकानाचे हस्तांतरण { शिधा वाटप सुविधा } तात्काळ राठोडी गाव मध्ये करण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरेश वाघमारे यांनी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ याना ट्विटर द्वारे केली असून याबाबत येथील जनतेने सदर दुकानावर कारवाई झाली ती रास्त असून दुकान खूप दूर दिल्याने अधिकाऱयांनी जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये दुकान दुर देऊन संभ्रम निर्माण केला आहे सदर दुकानाला पूर्ववत करण्यासाठी काही राजकीय पाठबळ मिळत असून दुकांदार आहे मी कुठल्याही प्रलोभनास बळी पडत नसल्याचे बघून माझ्याविरुद्ध गेलेल्या जनतेस भडकविण्याचे षडयंत्र आखीत आहे या गंभीर घटनेकडे अन्न पुरवठा मंत्री भुजबळ साहेबानी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ८ दिवसाच्या आत राठोडी गाव येथे शिधावाटप दुकान हलविण्यात यावे घरातच अन्न त्याग आंदोलन जनहितार्थ केल्या जाईल असे सुरेश वाघमारे यांनी प्रतिनिधीं शी बोलताना सांगिलते सध्या पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण तणाव असल्यामुळे आपण अन्न त्याग आंदोलन माघे घ्यावे असे अवाहन मालवणी पोलीस ठाणेचे कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगदेव कालापाड यांनी सुचविल्यामुळे मी माझे आंदोलन तूर्तास पुठे ढकलले आहे एकीकडे महेश पाठक राज्य सचिव यांच्या सारख्या उच्च पदावर असलेल्यांकडून खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी आणि जाणीवपूर्वक जनतेच्या मनात दुकान दूर गेल्याचा रोष या सारख्या घटनेमुळे मी व माझे कुटुंब दहशतीखाली जगत असून अन्याविरुद्ध आवाज बुलंद केल्याने मानसिक तणाव सहन करावा लागत आहे असे शेवटी पत्रकार सुरेश वाघमारे यांनी सांगितले.