राजेश भांगे
नांदेड – आरोग्य विभागाने शुक्रवारी दि.३० रोजी एकुण २० रूग्णांचे स्वॕब नमुने तपासणीसाठी पाठविले व त्यांचे स्वॕब रिपोर्ट येई पर्यंत त्या रूग्णांना संशयीत म्हणुन काॕरंटाईन करायचे सोडुन हलगर्जी पणाचे कळस म्हणून (नेहमी प्रमाणेच) त्या रूग्णांचे साधे नाव, गाव,पत्ता व संपर्क नंबर लिहुन घेण्याची साधी तसदीही घेतली नाही व त्यांना वाय्रावर सोडुन दिल्याने ते वीसही रूग्ण अचानक बेपत्ता झाले पण जेव्हा त्यांचा स्वॕब रिपोर्ट आला तेव्हा त्या वीस पैकी चार जणांचे कोविड १९ रिपोर्ट पाॕझेटिव आल्याचे समजताच प्रशासना मध्ये एकच खळबळ उडाली व त्यानंतर पोलिस प्रशासनाने शर्तिचे प्रयत्न करून त्या बेपत्ता वीस जणांपैकी सोळा लोकांना शोधुन काढले. मात्र त्या वीस पैकी ज्यांचे कोरोना स्वॕब रिपोर्ट पाॕझेटिव्ह आलेले आहेत ते चार बेपत्ता झालेले ( माणवी बाॕम्ब ) रूग्ण साठ तास उलटुन गेले तरीही ( दि.४ ; सायं १० वा. पर्यंत ) अद्यापही प्रशासनाच्या हाती लागलेले नाहीत. तरी या धक्कादायक प्रकारामुळे आणखी किती लोकांचे जीव धोक्यात येईल या विचारानेच थारकाप उडतो आहे. व नांदेड प्रशासनाचे कामकाज याच पद्धतीने चालल्यास नांदेडचे न्युयार्क व्हायला वेळ लागणार नाही व सध्या राज्यात गाजत असलेल्या नांदेडचे नाव जगात गाजल्या शिवाय राहणार नाही.
(तरी अशा घटनेने असेच दिसुन येते कि जिल्हा प्रशासनाचे लक्ष (वचक) न राहील्याने नांदेड मध्ये तसेच जिल्ह्यात सर्वत्र लाॕकडावुनचे तीन तेरा वाजलेलेच दिसुन येत आहे व तसेच अशा गंभीर परिस्थितीत प्रकण हाताबाहेर जात असल्याचे माहीत असुनही जिल्ह्यातील काही ठिकाणचे तालूका प्रशान बेजबादार होवुन आपले कर्तव्य नीट बजावत नसुन मलीदा खायायचे दिवस केव्हा येतात याचीच वाट ते पाहत असल्याचे चित्र ही यावेळी दिसुन आले.)
तसेच नांदेड मध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारला जबाबदार कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पालकमंत्री काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तरी लॉकडाऊन मुळे पंजाब मधील जे शिख भाविक नांदेडला अडकून पडले होते त्या भाविकांना त्यांच्या स्वगृही पोहचवण्यावरुन जिल्ह्यातील नेत्यांनी मोठी राजकीय आदळआपट करत त्याच श्रेय घेण्यासाठी भरपूर असा गाजावाजा केला. रोजच्या रोज पेपरबाजी.. त्या टेलिव्हिजन चॅनेल्सवरील बाईट..मुलाखती.. पण त्यानंतर आजची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर बोलण्यासाठी मात्र यातील एकही नेता पुढे येत नाही आहे.
त्या शिख बांधवांना स्वगृही पोहचवण चुकीच नाही. पण ते पोहचवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली का हा खरा प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रपंचातून एक तर पंजाब मध्ये कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ झाली आणि दुसरी इकडे नांदेडची वाटचाल ऑरेंज कडून रेड (HOT) झोन कडे. मग ह्यातून नेमक साध्य तरी काय झालं..?
हे सगळे प्रश्न उपस्थित करून केवळ त्या नेत्यांना याबाबत दोष देण्याचा उद्देश नाही, पण एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी हे नेते जेवढी अटा पिटा करतात त्याच्या किमान काही अंशी तरी ह्या नेत्यांनी पुढ येवुन ह्या गोष्टींच्या जिम्मेदारीच ओझ स्वतःच्या खांद्यावर घ्यायची तयारी नक्कीच दाखवायला हवी व आपण कुठे चुकलो याचे चिंतन करून लवकरात लवकर सदरील उद्भवलेली परिस्थिती पुर्वव्रत कशी करता येईल या अनुशंगाने रितसर उपाय योजना करून आपणच नांदेडचे खरे भाग्य विधाते आहोत हे दाखवुन द्यावे असे सर्व सामान्य जनतेतुन बोलले जात आहे.