Home महत्वाची बातमी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश.!

पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश.!

107

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – नव मार्च रोजी स्वच्छ भारत मोहीम अंतर्गत स्वच्छतेचे काय? महत्व आहे यावर पथनाट्य सादर करून डॉ आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा. च्या विद्यार्थ्यांनी पढेगाव येथील लोकांमध्ये जनजागृती केली. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा. च्या वतीने वर्धा जिल्ह्यातील पढेगाव या गावांमध्ये आठवडी बाजारात पथनाट्य करून ग्रामीण लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. डॉ. प्रा. प्रवीण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रिती तेलंग,प्रिती राठोड,प्रतिक्षा काळबांडे,प्रतीक्षा पाखले,प्राजक्ता निखार, प्रिया आष्टनकर,प्रणाली वेले इत्यादी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले यावेळी पढेगाव येथील सरपंच मा श्री अनंता हटवार सदस्य सौ जयताई शेंडे ,अंगणवाडी च्या सेविका व विद्यार्थी आणि गावातील गावकरी लोक यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.