Home मुंबई जात पडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण करा..!

जात पडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण करा..!

168
0

लियाकत शाह

मुंबई , दि. १२ :- जातपडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण केल्यास,संबंधित व्यक्तीचा पुढील त्रास वाचेल, त्यामुळे ज्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते, त्याची जातपडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने आज विधानसभेत सादर केलेल्या जातपडताळणी सुधारणा विधेयकावर ते बोलत होते. पाटील म्हणाले की, सध्या राज्याच्या जातपडताळणी विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती नोकरी, प्रवेश प्रक्रिया, निवडणूक आदी कारणांसाठी जातपडताळणी विभागात आल्यानंतरच ती प्रक्रिया सुरु केली जाते. त्यामुळे एकीकडे जातपडळणी विभागाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे जातपडताळणीच्या प्रक्रियेला लागणारा विलंब पाहता, शालेय जीवनातच जातपडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी. जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची वहित कालमर्यादा पूर्वी तीन महिन्याची होती, ती वाढवून पुढे सहा महिने करण्यात आली. आता पुन्हा ती वाढवून एक वर्ष का करण्यात येत आहे, असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारला.

Previous articleपथनाट्यातून दिला स्वच्छता जनजागृतीचा संदेश.!
Next articleतळेगांव येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here