अब्दुल कय्युम
औरंगाबाद – आज दिनांक १ मार्च रोजी संगमनेर येथून महसूल मंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांनी देशात शांतता सद्भावना राहावे यासाठी अजमेर शरिफ येथील दर्गा हजरत ख्वाजा मोहिनोद्दीन चिस्ती यांच्यासाठी पवित्र चादर पाठविली आहेत. अजमेर शरीफ येथील दर्गाचा ऊरसा निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नामदार बाळासाहेब थोरात यांनी पवित्र चादर फुल अजमेर शरीफ पाठविले आहेत.
या देशात शांतता सदभावना एकता रहावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली यांच्यासोबत औरंगाबाद शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री आकेफ रजवी,अनिस पटेल, मोईन इनामदार आदी उपस्थित होते.