Home विदर्भ आयटक आर्वी अंगणवाडी कर्मचारी मेळावा.

आयटक आर्वी अंगणवाडी कर्मचारी मेळावा.

192

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एल्गार मोर्चात सहभागी व्हा -विजया पावाडे

वर्धा , आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने आर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा १७ फेब्रुवारी २०२० रोजी मंगला इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडला मेळाव्याचे उदघाटक जिल्हा अध्यक्ष विजया पावडे व जेष्ठ अंगणवाडु सेविका आशा गळहाट यांनी सावित्रीबाई . यांच्या फोटोचे पुजन करुन केले
राज्य शासनाने समान किमान कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचा आश्वासन पुर्ती साठी *मुंबई विधानसभेवर आयटक वा कृती समितीच्या वतिने २६ फेब्रुवारी रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विजया पावडे यांनी केले
त्यापुढे म्हणाल्या केंद्र सरकारने किमान वेतन पेंन्शन देण्याचे आश्वासन दिले खरे परंतु नुकत्याच झालेल्या बजेट अधिवेशात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली हे आपण बघितले केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनपुर्ण व्हावे म्हणून *आपले प्रश्न आपला प्रतिनिधी* आपले लोकसभा प्रतिनिधी खासदार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे .
मुख्य मार्गदर्शक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे तर अतिथी जिल्हा सचिव वंदना कोळणकर कोषाध्यक्ष मैना उईके तालुका अध्यक्ष बबीता चिमोटे शहर अध्यक्ष ज्योती कुलकर्णी मिना ढोके सुलभा तिरभाने ममता देशकर आशा चतुर संगीता ठाकरे रिता पावडे संगीता मनवर यांनी आपले विचारा व्यक्त केले
मेळाव्यात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली *प्रकल्प कार्यालया कडून अनेक प्रश्न सोडविण्यात आल्यामूळे अधिकारी कर्मचाऱ्यांचा अभिनंदन ठराव* घेण्यात आला .
शहरातील अंगणवाडी केंद बांधून मिळावे .मुलांच्या सास्कृतीक कार्यक्रमासाठी निधी देण्यात यावा आपले प्रश्न विधानसभेत मांडण्यात यावे म्हणून आमदार दादाराव केचे यांच्या कार्यालयावर धरणा देवून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला .
मुख्य मार्गदर्शक राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी कामगार कायदे व शासनाची भुमीका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . *कामगाराची एकजुट हिच कामगार कायदे ठिकवून ठेवण्यास मदत होईल* असे सांगितले

.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व शासनाची भुमीका या बाबत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हा सचिव काँ वंदना कोळणकर यांनी आयुक्त कार्यालयाने काढलेला आदेशाचा निषेध करीत अंगणवाडी हि फक्त मुलांनसाठी नसून सर्व लाभार्थ्यासांठी आहे . *अंगणवाडी समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज राहावे* असे आवाहन केले .
तेपुढे म्हणाले आयटक संघटनेनी १० वर्षापुर्वीच इंग्रजी शाळा प्रमाणे मुलांना अनोपचारी शिक्षण शिकविण्यासाठी सेविकांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती गावा गावात काँन्व्हेट उघले असून सुजान नागरीकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे या अपेक्षानीच प्रवेश घेतला त्यामुळे अंगणवाडी मुलांची संख्या कमी झाली.याला शासनच जबाबदार आहे . *सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये ३ ते ६ वयोगटातील मुलांचे पुर्व प्राथमिक शिक्षण फक्त अंगणवाडीतच व्हावे असे सांगितले तरी काँन्व्हेटला कोणी मान्यता दिली* अशा प्रश्न निर्माण होतो.
अंगणवाडीत केंद्रात आकार शिक्षणातून अनोपचारी शिक्षण देण्याचे आदेश आहेत ते पालकांना मान्य नाही .त्यामुळे सेविका समोर धर्मसंकट निर्माण झाला आहे .पालकांच्या इच्छानुसार इंग्रजी अक्षरांची ओळख व पोयम शिकविने गरजेचे आहे – तर शासनाच्या मते आकार अभ्यासक्रमा नुसार कागदाचे वस्तू लोढणे .उलटे चालने इत्यादी प्रत्येक दिवशी वेग वेगळी कृती करुन शिकविणे. इत्यादी . *अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्का सोबत कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करणे गरजेचे आहे केंद्र सरकारने अनेक आश्वासन दिले परंतु आश्वासन पुर्ण न करता फक्त तोंडाला पाने पुसले* आहे
*पंतप्रधान जिवनज्योती विमा योजना* *पंतप्रधान सुरक्षा विमा योजना* *अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना* अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आँक्टोबर २०१८ पासून लागू करण्यात आले असे स्वतः पंतप्रधान नरेन्द मोदी यांनी जाहीर केले . त्याची अमंलबजावणी होत नाही . *चार वर्षा पुर्वी सेवानिवृत सेविका मदतनिसांना एकरक्कमी लाभ नाही.राज्यातील ठाकरे सकारने आपल्या समान किमान कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्याचे जाहिर केले .ते येणाऱ्या बजेट मध्येच कळेल* असे सविस्तर मार्गदर्शन कोळणकर यांनी केले .
मेळाव्याचे प्रास्तावीक सुलभा तिरभाने यांनी सेलु तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या ठेवीत त्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली तसेच मेळावा घेण्याचा उद्देश प्रास्ताविक करुन सांगितले .
*वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापीकांना जाळण्याचा निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा ठराव ठेवला आणी सर्वानी निषेध निषेध करीत पारीत करण्यात आला. संघटनेचीतिन वर्षाकरीता आर्वी तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.
*अध्यक्ष* सुलभा सुलभाने *कार्याध्यक्ष* बबिता चिमोटे *उपाध्यक्ष* आशा गळहाट ज्योती गुजाराम मालाती आवते ललीता वानखेडे संगीता मनवर *सहसचिव* रिता पावाडे नंदा ठाकरे आशा चतुर चंदा करनाके अर्चना वाघ *कोषाध्यक्ष* संगीता ठाकरे *सदस्य* * यमु टोकसे सुनिता नेहारे लता धाडसे ज्योती शेंडे उषा लोणकर विनीता काळे यांचा समावेश आहे

मेळाव्याचे संचालन मिना ढोके तर आभार ममता देशकर यांनी केले .
मेळाव्यात शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते