
विदर्भ साहित्य संघ शाखा जांब आणि ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५रोजी होऊ घातलेल्या ६९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज जांब या गावी प्रकाशन करण्यात आले शेतात राबणाऱ्या शेतकरी शेतमजुरांकडून या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले आहे. जांब येथील शेतकरी श्री सहदेव मेश्राम आणि सौ अनुसयाबाई मेश्राम यांच्या हस्ते हे बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आले.यावेळी शेतात सोयाबीन कापणाऱ्या शेतकरी शेतमजूरांनी या प्रकाशन सोहळ्यात मोठ्या आनंदाने भाग घेतला. कष्ट करणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत साहित्याचा विचार पोहोचला पाहिजे परिवर्तनाचा विचार त्याच्या धुऱ्यापर्यंत गेला पाहिजे हे या संमेलनाच्या आयोजनामागील हेतू असल्याचे या निमित्ताने दिसून आले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जांब यवतमाळ सह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील युवक कामाला लागले असल्याचे चित्र स्पष्ट पाहायला मिळत आहे.
या प्रकाशन समयी ईश्वर फाउंडेशनचे प्रतिनिधी तथा संमेलनाचे मुख्य आयोजक हेमंतकुमार कांबळे कार्याध्यक्ष मनोहर शहारे आयोजन समितीचे पुरुषोत्तम टिचुकले, जनार्दन राठोड व शेतात राबणारे शेतकरी शेतमजूरराहुल परचाके ,
राजू माघाडे हरीश वाघाटे,
उमेश परचाके,शारदा माघाडे
राजू पटेल वर्षा पारधी रेखा पेंदाम
आदीजन प्रामुख्याने हजर होते.











































