Home उत्तर महाराष्ट्र श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा२०२२

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा२०२२

114

 

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातून…

 

राजेंद्र भांड

ञंबेक्श्वर येथून पंढरपूर कडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा या अभंगाप्रमाणे येथील ग्रामस्थांनी सडा रांगोळ्या काढून टाळमृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत केले गेल्या दोन वर्षापासून कोरोणा महामारी मुळे दिंडी सोहळा बंद होता त्यामुळे वारकऱ्यांना देखील विठुरायाच्या भेटीची आस लागली होती येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांना मिष्टान्नाचे भोजन देत आशीर्वाद घेतले पालखीच्या दर्शनासाठी वांबोरी सह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली होती दुपारचे भोजन आटपून पालखी डोंगरगण च्या दिशेने प्रस्थान ठेवले पंढरीनाथ महाराज की जय…. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय… विठ्ठल विठ्ठल जय हरी पाऊले चालती पंढरीची वाट… अशी सुश्राव्य भजने येथील बँड पथकाने गायन करत पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत केले रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या फुलांची उधळण लक्ष वेधून घेत होती. वांबोरी च्या पुढे डोंगरगण घाटात पालखीने वळण घेताच संत निवृत्तीनाथ महाराज की जय अशा गगनभेदी जय जय कार करण्यात येत होता यंदा वारीमध्ये ज्येष्ठ वारकऱ्यांचा सह तरूणाईचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शासनाच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी स्वागत केले. नॉर्दन ब्रांच पासून येथील स्थानिक भाविकांनी पालखी खांद्यावर घेतली वाजत गाजत हरिनामाचा जयघोष करत श्रीराम मंदिरामध्ये पालखी आली मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा प्रणिती गिरमे, यांच्यासह रोनक गिरमे, गौतम उपाध्ये आदींनी पालखीचे पूजन केले पालखी सोहळ्याचे मानकरी मोहन महाराज बेलापूर . यावर्षी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असून त्रंबकेश्वर पासून श्रीरामपूर पर्यंत लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. यावर्षी पालखी सोहळ्यात ४८ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तसेच कालचा *डोंगरगण घाट* यशस्वी हरिनामाचा गजर करत पार केला अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प . पुंडलिक नाना थेटे यांनी दिली यावर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाला नाशिक जिल्ह्यातील मुरंबी येथील शेतकरी गजीराम मते यांची खिल्लारी बैल जोडी यांची सारथ्य करत आहे. तसेच पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते त्या ठिकाणी रांगोळी काढून तसेच त्या रांगोळीतून सुंदर वारी निर्मल वारी यासह वेगवेगळे सामाजिक संदेश देत प्रबोधन करत राजेंद्र जुन्नरकर (आळंदी) हे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ४७० किलोमीटर पालखी बरोबरच पायी प्रवास करत रांगोळीची सजावट विनामूल्य करत संत निवृत्तीनाथांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात. पालखीचा आजचा मुक्काम

अहमदनगर शहरात दिनांक 24 व 25 असे दोन दिवस संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मुक्कामी असते येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात येथील हमाल बांधवांच्या वतीने पालखीची भव्य स्वागत करण्यात येते दिनांक 25 रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येतो या सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे