यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी):- सरकार कोरोना लसीकरण सक्तीचे आदेश काढत असल्यामुळे संविधानिक मुल्याचे हनन होत असल्यामुळे बेकायदा केलेली लसीकरणाची सक्ती व नागरीकांनावरती लादले गेलेले निर्बध राज्यसकारने तात्काळ मागे घ्यावेत यासाठी बहुजन मुक्ती पार्टी पाच टप्यात अंदोलन करत असून आज त्यातील पहीला टप्पा पुर्ण केला.
एकीकडे लस बंधनकारक नाही असे न्यायालयाचे आदेश असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी लसीकरण सक्तीचे आदेश काढत आहेत त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जो लसीकरण सक्ती विरोधात अंदोलनाचा पहीला टप्पा होता त्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री मा. आरोग्यमंत्री,मा.मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्याचा होता. ६ डीसें ते १५डिसें २०२१ या पहील्या टप्यात आज दारव्हा येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मा.तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देऊन काही सविस्तर मागण्या केल्या आहे.
*१.लसीकरण झालेल्या लोकांना कोरोना होणार नाही किंवा इतर आजार उद्वभवणार नाही अशी तज्ञानी तपासणी केली असेल तो अहवाल द्यावा.
*२. सदर कोरोना लसीमध्ये कोणते घटक आहेत ते लिखित स्वरूपात द्यावे.
*३. कोवीड आजार अस्तित्वात असल्याचे वैज्ञानिक माहीती असेल ते लिखित स्वरुपातील पुरावे द्यावेत.
*४. लाँकडाऊन केल्यास कोरोना होणार नाही त्यासाठी काही वैज्ञानिक पुरावा असेल तर तो द्यावा.
*५. कोरोनाचे निदान करण्यासाठी वाफरण्यात येणारी आरटीपीसीआर टेस्ट किट कितपत खात्रीशीर आहे ?ती किट विषाणू शोधू शकते का ?
*६. कोरोना लस कोरोना रोखण्यासाठी सक्षम आहे का ? याबाबत सविस्तर माहीती द्यावी.
७. कोरोना लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोना होणार नाही तसेच लस घेतल्यास त्यांना लसीमुळे इतर आजराची लागण होणार नाही याबबतचे हमीपत्र प्रशासनाकडून लिखित स्वरुपात देण्यात यावे.
८. एखाद्या व्यक्तीने घस घेऊन तो दगावला तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सहायत्ता निधी देण्याचे हमीपत्र महाराष्ट्र सरकारने द्यावे.
९. भारतीय घटनेच्या कलम २१ नुसार भारतीय नागरीकांना इलाज करून घेणे अथवा न करून घेणे यासंदर्भात पुर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाऊ शकत नाही तरीपण लसीकरण सक्ती करणारे आदेश जिल्हाधिकारी कोणत्या आधारावर काढत आहे हे लिखित द्यावे.
१०. जिल्हाधिकारी यांनी लसीकरण सक्तीचे आदेश काढणे म्हणजे संविधानाच्या कलम २१ चे सरळसरळ उल्लंघन आहे, या उल्लंघन केलेल्या अधिका-यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
अशा मागण्या असलेले निवेदन आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मा.तहसीलदार साहेब दारव्हा यांना बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष मदनभाऊ गाडे, शहराध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, प्रशांत ठाणे,पंकज सुर्यवंशी,गोलू* गायकवाड,लक्ष्मणराव कठाने निवेदन देताना उपस्थित होते.तर रमेश कांबळे,आशिष फुसांडे,प्रभाकर राऊत, यशवंत मनवर,पृथ्वीनंदन जाधव कुणाल उईके,अर्जुन पवार, दशरथ राठोड,प्रमोद मनवर, संदेश बनसोड, अंबादास ढवळे,फिरोज खा पठाण, रविंद्र खापरे, अजाबराव ढवळे,वासुदेव माने, सुखदेव मुधाने,राहुल मुधाने, भारत बावने,दशरथ शेंदूरकर,गणपत भगत,गोपाल हिवराळे,उमेश बन,अशोक खंडारे, हरीचंद चव्हाण,राजू राठोड, रिजवान खान, राजू भगत, विश्वास भगत असे अनेक जण सहकारी कार्यकर्ते यांच्या सह्या निशी निवेदन देण्यात आले.