घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
ना.बच्चु कडू यांच्या राजकीय अस्तित्व व सामाजिक विचार या संकल्पनेवर आधारित प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आज घनसावंगी तालुक्यातील ज्ञानेश्वर पा.पघळ यांनी आपल्या गौरव नारळे,भाऊसाहेब मुळे ,विलास भोजने,रामभाऊ गारदे, ज्ञानेश्वर मुळे,अशोक वैराळ,अजिंक्य चौधरी,रोहन खैरे इत्यादी प्रमुख समर्थकांसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष विदुर लाघडे,युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह अंबड येथे प्रवेश केला आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव संदीप धुळेअंबड तालुकाध्यक्ष राजेंद्र गायकवाड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सय्यद जुबेर पटेल,जि.समन्वयक मोहन मुंडे,युवा तालुकाध्यक्ष आकाश थेटे,ता.कार्याध्यक्ष राम ठाकूर,सुरेश खरात,नामदेव काकडे,चत्रभुज टापरे, श्याम काळवणे,राहूल कासोदे,कडुबा जाधव,रणजीत कचरे,माऊली हूसे,रामप्रसाद जाधव,सोपानराव गायकवाड,संदीप गायकवाड,शरद सानप,रामप्रसाद जाधव,शे.वशीम तांबोळी,श्रीकांत भुमकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विदुर लाघडे यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.