Home विदर्भ वर्धा जील्हातील राष्ट्रीय महामार्गावर अपघात

वर्धा जील्हातील राष्ट्रीय महामार्गावर अपघात

966

इकबाल शेख

वर्धा –  हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सुगुणा कंपनी जवळ आज शनिवारी दुपारच्यावेळी टैंकरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहपाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.

टैंकर क्र एमएच-२१ डब्ल्यू-६४४७ हा नागपुर येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाला होता.या दरम्यान तालुक्यातील सेलु मुरपाड येथील वैभव नेहारे (२३) तसेच मयूर विलास कुमरे(२४) हे दोघे युवक पल्सर दुचाकी क्रमांक एम एच -३४ क्यू-३५ ९४ ने सुगुणा फॅक्टरीकड़े निघाले होते,त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन समोर जात असलेल्या टैंकरला धडकली. सदर झालेल्या अपघातात दुचाकी चालक वैभव नेहारे (२३) जागीच ठार झाला तर मागे बसून असलेला एक जण गंभीर जखमी झाला.
सदर अपघात तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वणी शिवारात घडली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून जखमीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,येथील डॉक्टरांनी त्याचे दोन्ही पायास गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात पाठविले.
मृतक तसेच त्याचा सहपाठी हे दोघेही सुगुणा फॅक्टरीमधे नोकरीच्या शोधात दुचाकीने निघाले होते,परंतु रस्त्यातच त्यांचा असा दुर्दवी अपघात घडला. सदर घटनेचा पुढिल तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वसंत शुक्ला,पोशी सौरभ गेडाम करीत आहे

Previous articleगोठा जळून दोन बैल ठार
Next articleआजोबा आणि मुलाने बापास मारून टाकले…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.