Home जळगाव संकटाच्या या कळात कोणत्याही परिस्थिति शिक्षण सुरू ठेवण्यासाठी 11-कलमी कार्यक्रम राबवा –...

संकटाच्या या कळात कोणत्याही परिस्थिति शिक्षण सुरू ठेवण्यासाठी 11-कलमी कार्यक्रम राबवा – (शिक्षण तज्ञ) मुबारक कापडी

331

रावेर (शरीफ शेख)

तालीम हमरी हर हाल मे जरी” शैक्षणिक जण जागृती अभियान च्या ऑनलाइन उद्घाटन व्याख्यान द्वारे शिक्षण तज्ञ मुबारक कापडी यांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवावे असे मत व्यक्त केले आहे.
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) च्या वतीने शैक्षणिक जागरूकता अभियानाची सुरूवातीला आयोजित “विखुरलेले वर्ग आणि शिक्षकांची जबाबदारी या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे” आपल्या बहुमूल्य व्याख्यान द्वारे
शैक्षणिक जागृती अभियान (प्रारंभिक) उद्घाटनप्रसंगी शिक्षण तज्ञ मुबारक कापडी
यांनी आपल्या भाषणात 11 कृती कार्यक्रम सादर केला. निरनिराळ्या उदाहरणांची आणि अनुभवांच्या प्रकाशात, कोरोना संसर्गाच्या वेळेत व तदनंतर उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत शिक्षण व्यवस्थेत होणार्‍या बदलांना सामोऱ्या जाण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात गुंतवून ठेवण्यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे? कोरोना साथीच्या आजारात अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे किंवा शाळेपासून दूर झाले. विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा गुंतवून ठेवण्यासाठी अकरा-कलमी कार्यक्रम सादर केला . या मुद्यांमध्ये शैक्षणिक गस्त घालणे, विद्यार्थी व पालकांची भेटी त्रिकोणऐवजी शिक्षण व्यवस्था सक्रिय करणे, म्हणजेच विद्यार्थी, शिक्षक, पालक, , समाज , शैक्षणिक संस्था ,आणि प्रशासन,
शासनावर अवलंबून न राहता शैक्षणिक जनजागृतीसाठी इतर पाच कार्ये सक्रिय करणे समाविष्ट आहे. चांगल्या हेतूने वागावे, शैक्षणिक वर्षात चांगल्या हेतूने कार्य करावे, केवळ दिखावे पणा पुरते कामगिरी करू रहाणे पेक्षा चांगले कार्य करावे.
विशेषत शैक्षणिक संस्था, प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेप आणि शिक्षकांनी शिक्षकांमधील मतभेद विसरून शिक्षकांनी आपली क्षमता वापरली पाहिजे.
शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणामध्ये तज्ज्ञ बनवण्यावर भर दिला पाहिजे,
कारण भविष्यातील शिक्षणासाठी अद्याप शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यक्रम आयोजित केले जातात जे आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक, विज्ञान, गणित, सामान्य ज्ञान महत्वाचे आहे. शिक्षक हे शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करणे, सेवानिवृत्त शिक्षकांचा उपयोग करणे, पालकांना इतर विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी पावले उचलणे. सक्षम पालक आणि पालकांना इतर विद्यार्थ्यांना शालेय फी आणि इतर खर्चासह मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणे. इ.
श्री मुबारक कपडी यांनी अनुभवांच्या आणि घटनेच्या प्रकाशात वरील मुद्द्यांवर भाषण केले. दुपारी अडीच वाजता एहतेशाम नश्तर (अध्यक्ष आयटा मुंब्रा) यांच्या पवित्र कुराण पठण ने ऑनलाइन कार्यक्रमाची सुरुवात झाली . अतीक शेख (सचिव आयटा महाराष्ट्र) यांनी या शिक्षण जनजागृती अभिमानाचे उद्दीष्ट समजावून सांगितले. मोमीन फहीम अहमद (मीडिया सचिव, महाराष्ट्र) यांनी मुबारक कापडी शिक्षण तज्ञ यांचे परिचय दिले. अध्यक्षीय भाषणात सय्यद शरीफ (अध्यक्ष, आयटा, महाराष्ट्र) यांनी शैक्षणिक जागृती अभियान स्वरूप व त्यांची आवश्यकता यावर थोडक्यात माहिती दिली. शरीफ खान जालना, यांनी कार्यक्रमाच्या शेवटी
अतिथी वक्ता, शिक्षक,पालक, व सर्व दर्शकांचे आयटा तर्फे आभार मानले. नईम खान (अभियानाचे संयोजक) औरंगाबाद, यांनी सूत्रसंचालनाची कामगिरी बजावली.
झूम मिट आणि आयटा महाराष्ट्रच्या यूट्यूब चैनल वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम YouTube चॅनेलवर पाहिला जाऊ शकतो. http://youtu.be/vGPVm_5oOYY
यासंदर्भात आयटा तर्फे 15दिवसिय शैक्षणिक जागरूकता अभियान अंतर्गत आणखी शैक्षणिक व प्रोत्साहित
कार्यक्रम आयोजित केले जातील.असे आयटा मिडिया सेल तर्फे कळविण्यात आले.