ईकबाल शेख
वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- शासनाच्या वतीने तासाच्या घोषीत बंद दरम्यान तळेगांव पोलीसांकडुन कोनत्याहि प्रकारची अमलबंजावनी करण्यात आली नसल्याचे चित्र शासनाच्या ३६ तासाचा कडकडित बंद असुन सुद्धा तळेगाव पोलिसांन कडुन वाहन धारक विना मास्क प्रवास करीर असुन सुध्दा उडान पुला खाली उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी कोनत्याहि प्रकारची दंडात्मक कार्यवाहि करीत नसुन नियमांचे उल्लघन करनार्यास अभय देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. तळेगांव पोलीस स्टेशनच्या काहि कर्मचार्यांची नियुक्ति येथील उड्डाण पुलाखाली करण्यात आली आहे परंतु बंद दरम्यान ज्या वाहनधारकांचे आवागमन सुरु होते त्यापैकी विनामास्क वाहन चालकांवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कार्यवाही करण्याकडे तळेगाव पोलीसांकडुन कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले असुन दिवसभर्यापासुन वृत्त लिहेस्तोवर फक्त देखाव्यादाखल चारच वाहन धारकांनवार दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु दिवसभरात कित्येकच वाहन धारक विना मास्क प्रवास करित असल्याचे आढळले असुन सुद्धा त्यांच्यावर तळेगांव पोलीसांकडुन जानीवपुर्वक कोणत्याहि प्रकारची कार्यवाहि करण्यात येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत होत.