Home जळगाव जखमी तरूणाचे प्राण वाचविणाऱ्या पत्रकार जकी अहमद यांचा सत्कार

जखमी तरूणाचे प्राण वाचविणाऱ्या पत्रकार जकी अहमद यांचा सत्कार

160

शिवाजी नगर रेल्वे रूळावर जखमी अवस्थेतील तरूणाचे वाचविले होते प्राण

रावेर (शरीफ शेख)

जळगाव शहरातील शिवाजी नगर स्मशानभूमीजवळील रेल्वे रूळावर ८ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेत पडलेल्या अनोळखी तरूणाला पत्रकार जकी अहमद यांच्या मदतीने तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वेळेत उपचार मिळाल्यामुळे रूग्णाचे प्राण वाचविल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मलीक आणि ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

जखमी तरूणाची ओळख पटली
सुरूवातील अनोळखी म्हणून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होत. आज सकाळी रूग्णाची ओळख पटली असून सागर संतोष भोई (वय-२२) रा. खेडी, नशिराबाद ता.जि.जळगाव असे जखमी रूग्णाचे नाव आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मालिक, ज्येष्ठ माजी नगरसेवक कैलास सोनावने, डॉ. रिज़वान खाटिक, सलीम इनामदार, रहीम तड़वी, पत्रकार अयाज़ मोहसिन, ॲग्लो उर्दू स्कूलचे शिक्षक आदी उपस्थित होते.

अशी आहे घटना
शहरातील शिवाजीनगर परिसरातील ममुराबाद रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एक जखमी तरुण विव्हळत पडला होता. त्याच्या डोक्याला, हाताला व नाकाला जबर मार बसला होता. त्याला एका पत्रकाराने ट्रॅकमॅन आणि नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीशेजारी तरुण रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत असल्याचे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पत्रकार जकी अहमद यांना दिसले. तसेच तेथून नागरिक त्याला बघून जा-ये करीत होते. मात्र त्याला हात लावायला कोणी तयार नव्हते. तसेच 108 अम्ब्युलन्सला कॉल करून देखील 15 मिनिटं वाट पाहून अखेर त्याच वेळी परिसरातील ओळखीच्या नागरिकांना बोलावून व ट्रेकमेन समशेर अली, नवाज अली, अरबाज खान, शोएब अली यांच्या मदतीने रिक्षाचालक तुषार ठाकरे याच्या रिक्षेत जकी अहमद यांनी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. याठिकाणी जनसंपर्क कक्षाची मदत घेत जकी अहमद, समशेर अली यांनी दाखल केले.

मान्यवरांच्या हस्ते सत्कार
पत्रकार जकी अहमद यांनी वेळीच कोणताही विचार न करता नागरीक व तरूणांच्या मदतीने एका अनोळखी व्यक्तीला तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केल्यामुळे प्राण वाचले. त्यांचे हे कार्यपाहून आज शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व केलेल्या कार्याचे कौतूक होत आहे.