पळून गेले लग्न केलं वापस आले अन विपरितच घडलं ???
अमीन शाह
प्रेमविवाह करून सासरी नांदण्यास गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये ही घटना घडली. या घटनेला काही तास लोटत नाही, तोच तरुणीच्या पतीनंही स्वतःला संपवलं. पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे, तर तरुणीचे नाव आरती आहे.
जळगाव जिल्ह्यात पाळधी गावातील आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं. घरातून विरोध असल्यानं दोघेही काही दिवस घरातून बेपत्ता होते. त्यानंतर दोघेही लग्न करुन घरी परतले. दोघे घरी आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. दोघांच्याही पालकांनी विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला. मात्र, सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. आरतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी पती प्रशांतनेही विषारी औषध घेतलं. त्यामुळे त्याचीही प्रकृती खालावली. त्याला जळगाव इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांतचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या मृत्यूच्या घटनेमुळे पाळधी गावातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मयत आरतीचे सासरे विजयसिंग पाटील, मृत प्रशांतचे मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी या तिघांना शनिवारी अटक केली. आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर अवघ्या ३-४ दिवसातच आरतीचा मृत्यू झाला. आरतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी प्रशांतनेही विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. पोलिसांनी या प्रकरणाता तिघांना अटक केली आहे.
पळून गेले लग्न केलं वापस आले अन ???
अमीन शाह
प्रेमविवाह करून सासरी नांदण्यास गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये ही घटना घडली. या घटनेला काही तास लोटत नाही, तोच तरुणीच्या पतीनंही स्वतःला संपवलं. पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे, तर तरुणीचे नाव आरती आहे.
जळगाव जिल्ह्यात पाळधी गावातील आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं. घरातून विरोध असल्यानं दोघेही काही दिवस घरातून बेपत्ता होते. त्यानंतर दोघेही लग्न करुन घरी परतले. दोघे घरी आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. दोघांच्याही पालकांनी विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला. मात्र, सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. आरतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी पती प्रशांतनेही विषारी औषध घेतलं. त्यामुळे त्याचीही प्रकृती खालावली. त्याला जळगाव इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांतचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या मृत्यूच्या घटनेमुळे पाळधी गावातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मयत आरतीचे सासरे विजयसिंग पाटील, मृत प्रशांतचे मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी या तिघांना शनिवारी अटक केली. आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर अवघ्या ३-४ दिवसातच आरतीचा मृत्यू झाला. आरतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी प्रशांतनेही विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. पोलिसांनी या प्रकरणाता तिघांना अटक केली आहे.