Home मराठवाडा लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव पहोचला पोलीस ठाण्यात

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव पहोचला पोलीस ठाण्यात

556

 

मधुचंद्राच्या रात्रीच नवरी गेली पळून ???

नगदी व दागिने ही घेऊन गेली ,

अमीन शाह ,

लग्न होऊन मधुचंद्राच्या दिवशीच नवं वधू दागिने व नगदी घेऊन पसार झाल्या मूळे खळबळ उडाली असून या प्रकरणी नवरी व त्याच्या नातेवाईकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण शहरांमध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये राहणाऱ्या कृष्णा कारभारी वंसारे या युवकाचे लग्न गेल्या अनेक दिवसापासून होत नव्हते . कृष्णाची आई सुनंदाबाई वंसारे यांनी आपल्या परिचयातील शेख नूर महमूद रा.तेलवाडी ( ता पैठण ) यांना मुलीचे एखादे चांगले स्थळ पाहण्यास सांगितले होते . स्थळ पाहण्यासाठी 5 हजार रुपये घेतल्यानंतर लगेच कृष्णासाठी जालना येथे चांगलं स्थळ असून आपण मुलीला 50 हजार रुपये हुंडा दिल्यास लग्नासाठी मुलीची बहीण व तयार होईल असे एका बैठकीत सांगण्यात आले त्या नंतर जालना येथील उषा पवार या मुली सोबत त्याचा सात फेऱ्याचा लग्नाचा कार्यक्रम पार पडला , लग्नात नवरी च्या अंगावर 70 हजाराचे दागिने घालण्यात आले होते ,

अखेर ती रात्र आली ?

प्रत्येकाच्या जीवनात ती रात्र म्हणजेच मधु चंद्राची रात्र फार महत्वपूर्ण असते मात्र त्याच रात्री ने वधू पळून गेल्या मूळे नवरदेव निराश झाला आहे ,

तक्रार दाखल ,

या प्रकरणी नवरा कृष्णा वानसरे , सासू सुनंदा बाई वानसरे यांच्या तक्रारीवरून पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ,