Home विदर्भ अतिवृष्टीमुळे नद्या ओलांडत आहे धोक्याची पातळी

अतिवृष्टीमुळे नद्या ओलांडत आहे धोक्याची पातळी

154

प्रशांत नाईक 

अमरावती – जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत आहे.
तसेच मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अमरावती जिल्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीवरील अप्पर वर्धा जलाशय मोर्शी व लोवर वर्धा जलाशय वरुड बगाजी (धामणगांव रेल्वे ) पूर्णपणे भरलेली असल्यामुळे जलाशयातून आज नदी मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.