
*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला*
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला होता..
त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आता काही खरे नाही असे वाटत असताना संजय निंबाळकर, प्रतापसिंह पाटील,जीवनराव गोरे,आदी नेत्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्त्व कमी झाले नाही हेही दाखवून दिले..
कळंब तालुक्यात मात्र जे आमदार राणा पाटील समर्थक होते त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता त्यामुळे जुन्या निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता..
कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एक सर्वसमावेशक, निर्भीड, व अनुभवी नेत्याची गरज होती.तीच गरज आताभासणार नाही कारण कळंब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते,नगरसेवक असणारे श्रीधर बाबा भवर यांची आज कळंब तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे..
श्रीधर भवर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुने नेते व कळंब शहर व परिसरातील नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामीण भागातील नवयुवकांना बँकेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात श्रीधर बाबा भवर यांचा मोलाचा वाटा आहे…










































