Home नांदेड चिंताजनक” नांदेड शहरातील एक (डॉक्टर ) व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, तर तीन बाधित...

चिंताजनक” नांदेड शहरातील एक (डॉक्टर ) व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, तर तीन बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले

116

नांदेड , दि. ९ : ( राजेश एन भांगे ) – आज शाहूनगर परिसरातील 41 वर्षे वयाच्या एका पुरुष बाधिताचा ( डाॕक्टरचा ) अहवाल पॉझिटिव्ह आला. मुखेड कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित व्यक्ती व पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील एक बाधित असे एकुण तीन बाधितांना बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 193 बाधितांपैकी 134 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 50 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत.

मंगळवार 9 जुन रोजी प्राप्त झालेल्या एकुण 30 अहवालांपैकी 29 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 193 एवढी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या 3 बाधितांपैकी 65 वर्षे वयाची 1 स्त्री, अनुक्रमे 65 व 74 वर्षे वयाच्या दोन बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

आतापर्यंत कोरोना मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 9 झाली आहे. जिल्ह्यात बाधित व्यक्तीं पैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 11 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. मंगळवार 9 जून रोजी 79 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 43 हजार 723,
घेतलेले स्वॅब 4 हजार 579,
निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 43,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 1,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 193,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 176,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-81,
मृत्यू संख्या- 9,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 134,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 50,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 79 एवढी संख्या आहे.

जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.