
समीर अहेमद शेख
अकोला – दिनांक १०/०५/२०२० सायंकाळी दरम्यान झालेल्या वादळी वारा,अवकाळी पाऊस, व गारासह संत्रा उत्पादक शेतकर्याचे आंबीया बहार पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.या आधी सुध्दा आताही अकोट तेल्हारा संग्रामपुर वह इतर तालूकयातील मंडळातिल शेतकर्याचे संत्रा आंबीया बहार पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.सद्या सुरु असलेल्या कोरोना विषाणु मुळे संपुर्ण लॉक डाऊन सुरु आहे.या मुळे शेतकरी आणखीच संकटात सापडलेला आहे.तरी याची त्वरित दखल घेऊन शासनाने संत्रा उत्पादक शेतकर्याच्या शेतीचे पंचनामे करुन शासनाकडून शेतकर्यांना लवकरात लवकर मदत मिळुन द्यावी या करिता आज दिनांक १२/०५/२०२० जन्म भूमि परिवर्तन किसान मजदूर संघटनचे जिला उपाध्यक्ष समीर अहेमद शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव जी बालासाहेब ठाकरे वह अकोला जिल्हाधिकारी साहेबला ऑनलाइन ई-मेल द्वारा आज निवेदन दिले आहे.
तरी विनंती आहे कि या नुकसानचा स्पष्टपने पंचनामा करून शेतकरयांना न्याय दीयावे पत्र देतया वेळी समीर अहमद शेख ग्राम पंचायत मेंबर वह कांग्रेस कार्यकर्ता राजीक कुरैशी शेख बरकतुल्लाह मोहम्मद शरीफ पत्रकार गणेश बूटे पत्रकार दीपक रेळे पत्रकार पत्रकार संजय भटकर पत्रकार विनोद वानखड़े विलास वानखड़े पत्रकार उपस्थित होते.










































