यवतमाळ , दि. ०१ – राज्यातचं नव्हे तर संपूर्ण भारतात कोरोना वायरसमुळे लॉक डाऊन असल्यामुळे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या आव्हानाला भारत देशात व राज्यातील जनता स्विकार करून कोरोना वायरसला हरविण्यासाठी तिस दिवसापासून घरात बसून लॉक डाऊनची अमल बजावनी करीत आहे .सदर शेकडो सामजीक संघटना शहरातील अडचणीत आलेल्या जनता जनर्धनांच्या व्यवस्थेत लागले आहेत , अश्यातच ग्रामीण भागात राहणार्या शेवटच्या एकही गरीब कुटुंबाकडे दुर्लक्ष होवू नये म्हणून माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री मा. हंसराजी अहीर साहेब यांनी पुढाकार घेऊन स्वस्त धान्या पासून वंचित असलेल्या घटकाची यादी तयार करुन त्यांना आपल्या कडून धान्य पुरवठा करण्याचे महान कार्य हाती घेवून पाठवलेलले सिधा धान्य किट आदिवासी गरजू लोकांच्या पोड , वाडी , तांडा वस्तीवर त्यांच्या दारी जावून शोशल डिस्टशिंगचे भान ठेवून गरजूवंतांना धान्य किटचे वितरण मोहन जाधव यांनी सरपंच , पो.पाटील , ग्रा.पं. सदस्य, भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख यांना सोबत घेवून वंचित , अपंग , भूमिहीन गरजू परिवरांना वाटप केले.