
➡️ घाटंजी येथे स्वातंत्र्य दिनी तलाठी भारत लढे यांचा तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते उत्कृष्ट तलाठी म्हणून सत्कार..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : शेतकरयांप्रती सदैव सहकार्याची भुमीका बजावणारया, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह नेहमीच मदतीस धावणारा व समाज बांधवांच्या “हाकेला ओ” देणारे कर्तव्य दक्ष तथा साहित्यिक, समता पर्व प्रतिष्ठानचे घाटंजी तालुका शाखेचे अध्यक्ष तलाठी भारत लढे यांना वर्षभर केलेल्या ई – पिक नोंदणी, पी. एम. किसान सन्मान योजना, सलोखा योजना, पिक विमा योजना आदी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तलाठी भारत लढे यांना उत्कृष्ट तलाठी म्हणून स्वातंत्र्य दिनी घाटंजीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय साळवे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सर्वोत्कृष्ठ तलाठी पुरस्कार मिळाल्याबाबत भारत लढे यांचे शिरोलीचे मंडळ अधिकारी अनिल येरकार, धनराज हलवले, पत्रकार चंद्रमणी कवाडे, सागर बेले, दिनकर मानकर, ताडसावळी येथील तलाठी रामेश्वर कुमरे, सुरज भवरे, विनोद मानकर आदींनी अभिनंदन केले आहे.












































