Home मराठवाडा मित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात

मित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात

290

जालना- लक्ष्मण बिलोरे

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात असतांना स्कार्पिओ गाडीचा अपघात होऊन पाच तरुण जखमी झाले.यातील तीन जण तरुण गंभीर जखमी झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात स्कार्पिओ चालक बलंबाल बचावला.


अंबड तालुक्यातील झिर्पि फाटा येथे ही घटना घडली. स्कार्पिओ एम.एच.१६ सि. क्यू.२२६४ ही एका वाहनास ओव्हरटेक करतांना समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही गाडी महामार्गाच्या खाली पंधरा ते वीस फूट खोल शेतात पलटी झाली. स्कार्पिओ चालक हरिभाऊ विठ्ठल झाम्बरे यांना या भीषण अपघात काहीच झाले नाही. हे दैव बलवत्तर म्हणून यादुर्घटनेत जीवित हानी झाली नाही.
यातील गंभीर जखमी पैकी महेश राजकुमार घोरतळे (२७) हे फ्रॅक्चर असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अक्षय बबन भोसले (२४) यांच्यावर जिल्हा रुग्णालय जालना जेथे उपचार घेत आहे.तर नौशाद मणियार ( २६) यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
किरकोळ जखमी असलेल्या जखमींवर अंबड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठवून दिले.