लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी
जालना – जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तुळजाभवानी मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने लाॅकडाउनमधील नियमांचे पालन करत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बुधवारी , १० जून रोजी येथील रामभाऊ सोपान बिलोरे यांची कन्या चि. सौ. कां. राणी आणि लोणी- सावंगी तालुका परतुर जिल्हा जालना येथील
भगवानराव वाशिंबे यांचे चिरंजीव आण्णासाहेब यांचे शुभमंगल पार पडले झाले.तीर्थपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव चिमणे आणि श्रीपत धामणगाव येथील संपत चौधरी या युवकांनी पुढाकार घेऊन हा छोटेखानी लग्न सोहळा घडवून आणला.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र आर्दड, शिवाजी कंटुले, बंडूबाॅस कंटुले, नाना महानोर,रविराज फर्निचरचे संजय कंटुले,बाबा उढाण,प्रकाश कंटुले उपस्थित होते.