Home मराठवाडा नागपूर येथे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात चार जखमी…!

नागपूर येथे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात चार जखमी…!

103

देव तारी त्याला कोण मारी….!!

बदनापूर – प्रतिनिधी

जालना – लॉक डाऊन मध्ये अडकून पडल्याने घरी जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊन पुण्याहून जालना मार्ग नागपूरला जाणाऱ्या सुझुकी आर्टिका कार चा समोरचा टायर पम्चर झाल्याने बदनापूर जवळ अपघात झाल्याने कार मधील चार जण जखमी झाले,सदर कारने चार प्लट्या खाल्ल्या मात्र दैव बलवत्तर असल्याने जीवित हानी झाली नाही .

नागपूर येथील विनोद मनोहरराव आरमारकर वय 50 व राजेंद्रकुमार दिनेशचंद गोयल यांच्या मुली पुणे येथे शिक्षण घेत आहे राज्यात कोरोना प्रदुभवामुळे लॉक डाऊन सुरू झाल्याने मुली पुण्यात अडकल्याने त्यांना घरी आणण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊन विनोद आरमारकर ,राजेंद्रकुमार गोयल, सानिध्या विनोद आरमारकर वय 24 व सोनाक्षी राजेंद्रकुमार गोयल वय 25 हे 8 मे रोजी सकाळी पुण्याहून औरंगाबाद-जालना मार्ग नागपूरला सुझुकी कंपनीच्या कार क्रमांक सी जी 12 पी 0219 मध्ये निघाले होते. सदर कार दुपारी 4:10 वाजता बदनापूर शहरातून निघाली असता काही अंतरावर जाताच कारचा समोरचा टायर फुटल्याने चालकांचे नियंत्रण सुटले आणि समोरून चाललेल्या दुचाकीला धडक देऊन चार प्लट्या घेत कार शेतात घुसली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही कार मधील चौघे किरकोळ जखमी झाले या कारच्या पाठीमागे पोलीस निरीक्षक एम बी खेडकर हे एका घटनास्थळी जात होते पण त्यांच्या डोळ्यासमोर अपघात झाल्याने त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी तातडीने दवाखाण्यात रवाना केले तर आमदार नारायण कुचे देखील पोहचले व त्यांनी आवश्यक सहकार्य करून जखमींना मदत केली दुचाकीस्वार विष्णू अंभोरे व रमेश गायकवाड यांना किरकोळ मार लागला.