पुणे – (प्रतिनिधि) – सध्या मोघली नावावरुन वादात सापडलेल्या वादग्रस्त औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्या संदर्भात संबंधित राजकीय पक्षातील लोकांनी फक्त एकमेकांवर शाब्दिक चिखल फेक न करता तसेच नामकरणा वरुन निव्वळ पोकळ गप्पा न मारता थेट नामांतरण करुनच आपला निवडणुकीतील जूना जाहिरनामा कृतीत आणावा असे कळकळीचे आवाहन शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी “मराठी राजभाषा दिन” व छत्रपती शंभुराजांच्या “धर्मवीर दिना” च्या पूर्वसंधेला केल्याने शंभुसेना संघटनेचे मराठी मातृभाषेवरील प्रेम व शंभुराजांवरील निष्ठा दिसून येत आहे.
सामाजिक संघटनेचे प्रमुख दिपकराजे शिर्के पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या तीन दशकापासून शहराच्या नामकरणाची मागणी होत असून या मागणीसाठी प्रथम शिवसेनेने अवघ्या महाराष्ट्रासह संबंधित जिल्ह्यात जोरदार आंदोलने केली होती मात्र सध्या तरी या आंदोलनाकडे त्यांच्याच पक्षातील लोकांनी गट- तट निर्माण केल्याने अनेक शिवसेना नेते सहभागी होताना दिसत नाही. आता तर खुद्द त्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना देखील हे नामकरणाचे घोंगडे भिजत का ठेवले असा प्रश्नही दिपकराजे शिर्के यांनी उपस्थित केला आहे.
Home महत्वाची बातमी येत्या शंभुजयंती पूर्वीच राजांना अभिवादन म्हणून सरकारने औरंगाबादचे “छत्रपती संभाजीनगर” असे नामकरण...