Home महत्वाची बातमी चित्रपट निर्मात्याला खंडणी मांगीतल्या प्रकरणी पाच पोलीस कर्मचारी अखेर निलंबित ,

चित्रपट निर्मात्याला खंडणी मांगीतल्या प्रकरणी पाच पोलीस कर्मचारी अखेर निलंबित ,

619

 

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची कडक कारवाई

अमीन शाह

बुलढाणा

चिखली शहरात वाहतूक पोलिसांकडून परराज्यातील वाहनचालककडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 5 पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणातील पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना एका आदेशान्वये निलंबित केल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडालेली आहे.
कर्नाटक राज्यातील चल्लकेरे येथील ताज अ. रहमान वय 23 वर्ष हे अकिब अरमान,शेख इब्राहीम आणि जुबेर अहमद या सहकाऱ्यांसह एका कारने 5 ऑगस्ट रोजी मलकापूरकडे चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते.या दरम्यान चिखली – बुलढाणा मार्गावर चिखली पोलिस ठाण्यातील 1 आणि जिल्हा वाहतूक शाखेतील 1 असे एकूण 2 पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले.वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 3 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने जवळच्या एका चहा विक्रेत्याच्या क्यूआर कोडवर 1500 रुपये दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.मात्र काही अंतरावर पुन्हा महामार्ग पोलीसच्या 3 कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून,वाहनात असलेल्या एअर रायफलमुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली.तडजोडीनंतर ही रक्कम 50 हजार रुपयांवर आली व ती देखील ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले. या 3 पोलिसांवर संशय आल्याने ताज रहमान यांनी वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनात बसलेले 2 पोलिस म्हणाले, “पैसे नको, आम्हाला उतरवा,” अशी मागणी त्यांनी केली. वाहन थांबवून पोलिसांना उतरवल्यानंतर काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतरही पोलिसांनी ताज रहमान यांना पैसे दिले नाहीत,म्हणून आता मोठी कारवाई होईल अशी धमकी दिली.या प्रकरणी फिर्यादी ताज अ.रहमान यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी अभय टेकाळे (चिखली पोलीस स्टेशन), गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक शाखा) तसेच महामार्ग पोलीस कर्मचारी विठ्ठल काळुसे, विजय आंधळे आणि संदीप किरके यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलं.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या घटनेला गंभीरतेने घेत एका आदेशान्वये या खंडणी प्रकरणातील 5 ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया कडून समजली आहे.