Home विदर्भ सौ.आरतीताई कारंजेकर सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तीमत्व

सौ.आरतीताई कारंजेकर सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तीमत्व

51

सामाजिक क्षेत्रात यायचेच नाही हा दृढ संकल्प मनात असून सुद्धा आपोआपच पाय हे सामाजिक क्षेत्रात पडले .समाजापरी असलेली आस्था आणि विषेश करुन नव्याने घडणारी पिढी ही व्यसनापासून दुर व शालेय शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणाकडे कसे वळेल या करीता सौ.आरतीताई कारंजेकर काम करीत असून आज त्यांचा वाढदिवस.! या वाढदिवसी त्यांच्या बाबत काही थोडेफार लिहावसे वाटले,

एक दिवस नक्कीच समाजातील लोकांवर, विद्यार्थ्यांवर महिलांवर परिवर्तन होऊन त्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल असा विश्वास आरतीताई यांना आहे.
आरतीताई प्रभावीपणे समाजाप्रती मत मांडून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
महींलानी व्यक्तिमत्व विकासासोबतच सर्वच क्षेत्रात उतुंग भरारी घेण्याकरिता सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे महिलांना मार्गदर्शन करून सागितले जाते.
सकारात्मक राहील्यास यश नककीच पदरी पडेल या विचारावर महिलांनी ठाम राहिल्यास स्त्रिशक्तीचा पराभव कधीच होणार नाही असे त्या महिलांना सांगतात.
समाजात जनजागृती व्हावी याकरिता अनेक सामाजिक संघटणा समाजाप्रती काम करतात.परंतु प्रत्येक महिलेचा , विद्यार्थ्यांचा व समाजातील सर्व घटकाचा व्यक्तीमत्व विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्या समोर ठेवून काम सुरू केले हे नक्कीच अभिनंदनीय आहे.
सौ.आरतीताई कारंजेकर यांची सामाजिक संघटने सोबतच चित्रपट क्षेञ व माध्यमांनी सुद्धा दखल घेतली.त्यांना महाराष्ट्र आयटक संघटनेचा महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,तर पञकार संरक्षण समितीच्या वतिने समाजसेविका म्हणून गौरविण्यात आले. चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेञी किशोरी शहाणे यांच्या वतीने पावरफुल वूमन म्हणून सन्मानित करण्यात आले.तर लाॅग मार्च प्रणेते आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या वतिने सामाजिक क्षेत्रात काम केल्या बद्दल गौरविण्यात आले.सोबतच आधार फाऊंडेशन,पडेगाव येथील ग्रामपंचायत तसेच नागपूर येथील सामाजिक संस्थेकडून राष्ट्रमाता इंदिरा गांधी नारीवैभव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अश्या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थानी सौ.आरतीताई यांची दखल घेतल्या गेली.
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दुर राहण्याकरीता प्रत्येक महाविद्यालयामध्ये,महिला बचत गटातील संघटिका यांना भेटून इवल्याश्या विद्यार्थ्यांवर याचे सकारात्मक परिणाम होवून व्यसनापासून दुर कसे राहतील आईवडील जे विद्यार्थ्यांवर शिक्षणाकरीता खर्च करतात त्या संधीचे सोने कसे होईल याबाबत कौशल्य पणाला लावून सकारात्मक उर्जा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या मनात एक चागंली कल्पना येवून तो कसा सक्षम होईल याकरीता आरतीताई विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व विकास व्हावा याकरीता मार्गदर्शन करतात. आपण समाजासाठी काहीतरी करावे या भावनेने
त्या स्वतः प्रेरित होऊन इतरांना प्रेरित करतात.
आज १३ मे त्यांचा वाढदिवस आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!!!

सौ.नलिनीताई पवार