मुंबई (प्रतिनिधी ) – संपूर्ण जगामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 150.देशा मध्ये मानवंदना जयंती दिनी देऊन मोठ्या हर्ष उल्हासाने भीम जयंती साजरी होते ,
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत रात रात जागून आदर्श अशी लोकशाही भारत देशाला बहाल केली तेंव्हा मानवाला व पशु पक्ष्याला जगण्याचा संविधानिक अधिकार मिळाला खरोखर आदर्श लोकशाही चे राज्य असल्यामुळे च सर्वांना आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन 130.व्या जयंती निमित्त आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी केले .कमळ तलाव मारवे रोड मालाड पश्चिम मुंबई या ठिकाणी आयोजित भीम जयंती कार्यक्रमात प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक 33.चे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांची उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाची सुरवात नगरसेवक चौधरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हारअर्पण करून झाली.तसेच फाईट फॉर राईट फाउंडेशन चे प्रमुख विनोद घोलप .वंचित बहुंजन आघाडी चे जिल्हा नेते सुनील खरे .आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले .यावेळी या विभागातील कोरणाचे नियम पाळत असल्यामुळे फिजिकल डिस्टन्स देऊन जेमतेम लोक उपस्थित होते .आकाश ओव्हाळ राजेंद्र सौदा जाफर शेख रवी शिंदे .दिनेश शिंह सुरेंद्र सिह अगतराव आवटे . दिलीप शिंह वसंत कांबळे सुनील वाघमारे महेंद्र भालेराव .सतीश वाकळे . अली रजा कल्पेश शिंदे आदी सह उपस्थित होते