विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे
राज्यात दि.२५ एप्रिल रोजी कोरोना बाधीत ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली असुन. यामुळे आता एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. तरी आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असुन आता पर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे मा.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोग शाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईन मध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.