
पवन जाधव
बार्शीटाकली , अकोला
कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव येथील गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. या प्रकारचा निर्णय घेण्यात आले असून. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घराबाहेर न जाणं, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या . या शिवाय गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सुचनाही ग्राम पंचायत वडगाव येथील सरपंच मालती चरण जाधव यांनी गावातील नागरिकांना सांगितले असून सर्व रस्ते बंद करण्यात निर्णय घेण्यात आले असून पंजाबराव जधाव साहेबराव जधाव व गावातील तरुण युवक अतुल पवार मुकेश राठोड निलेश जधाव सोपान निळखन मुन्ना निळखन हे गाव बंद साठी पुढे सरसावले










































