
उबाठा. व शिंदे गटाचे वाघही डरकाळी फोडणार…..

—————————————-
काँग्रेसमध्ये स्पर्धा नसल्याचे अंदाज..
—————————————-

राजू चव्हाण
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुक संपताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे.आर्णी – केळापूर मतदार संघात भारतीय जनता पक्षात उमेदवारी करीता रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.महायुतीमध्ये आर्णी – केळापूर मतदार संघावर भाजपचा प्रबळ दावा असल्यामुळे याठिकाणी चांगलीच गर्दी झाल्याचे दिसत आहे.भाजपच्या चांगल्या पदावर असलेले नितीन मडावी यांनीही आपली दावेदारी घोषित केल्याने भाजपात गट पडताना दिसून येत आहे.

















































