Home विदर्भ ग्रामपंचायत मध्ये श्रेयवादा मुळे कामे रखडली….!

ग्रामपंचायत मध्ये श्रेयवादा मुळे कामे रखडली….!

200

यवतमाळ / महागाव – तालुक्यातील तुळशिनगर ग्रामपंचायत मध्ये श्रेया वादाची लढाई पाहण्यास मिळत आहे. पूर्वीपासून असलेली ग्रामपंचायत यांनी नियोजित ठरविलेली विकास कामे पूर्णत्वास येत असताना सत्ताबदल झाल्यामुळे नवीन सत्ताधाऱ्यांना पूर्वीचे नियोजित विकास कामे पूर्ण करण्याचे जीवावर येत असल्याचे दिसून येत आहे.

त्याचे ताजे उदाहरण म्हणजे घरकुल योजना व जॉब कार्ड याकरिता महागाव गटविकास अधिकारी यांनी तीन महिन्यापूर्वी दिलेले पत्र व त्यावर झालेली शून्य कारवाई हे नवीन ग्रामपंचायतच्या कामाची पावती असल्याचे दिसत आहे. महागाव गटविकास अधिकाऱ्यांनी या पत्राची अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले असताना आज तीन महिने उलटले तरीही ग्रामपंचायत ची कोणतीही कारवाही दिसून येत नाही. यामुळे गावामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झालेली आहे आणि कामही झालेले नाही याचा अर्थ गावकऱ्यांनी काय लावावा याबद्दल गावात चावडीवर रंगतदार चर्चा होत आहे.