Home मराठवाडा अंबड शहरात खळबळ : अन्यायाची तक्रार नोंदवून न घेतल्याने गौरी कुलकर्णी यांचाआत्महत्येचा...

अंबड शहरात खळबळ : अन्यायाची तक्रार नोंदवून न घेतल्याने गौरी कुलकर्णी यांचाआत्महत्येचा प्रयत्न

1626

लक्ष्मण बिलोरे

जालना – पतीला मारहाण केली असल्याची तक्रार घेवून अंबड पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलेला पोलीस निरीक्षक व इतर पोलिसांनी अपमानास्पद वागणूक देत असभ्य वर्तन केले असल्याचा आरोप अंबड शहरातील गौरी पंकज कुलकर्णी या महिलेने केला आहे.

संबंधित पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व इतरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जालना जिल्ह्याच्या अंबड शहरातील गौरी पंकज कुलकर्णी या महिलेने जालना पोलीस अधीक्षक, औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात गौरी कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, आपल्या सोबत अंबड पोलिसांकडून झालेल्या अन्यायाची दाद जालना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विभागीय पोलीस अधिकारी या वरिष्ठ पोलिसांकडे केली परंतु दखल घेतली नाही म्हणून आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून संबंधित पोलिसांवर कारवाई नाही केल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे.

सदर निवेदन ईमेल द्वारे औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आले असल्याचे गौरी पंकज कुलकर्णी या महिलेने सांगितले.